नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग, ट्रॉली घेऊन येणारा व्यक्ती CCTVत कैद

Last Updated:

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार नितेश राणे यांच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर एक संशयास्पद बॅग आढळली आहे.

News18
News18
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार नितेश राणे यांच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर एक संशयास्पद बॅग आढळली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ही बॅग नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर ठेवून पळ काढला आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस बॅग ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मागील काही दिवसांपासून नितेश राणे हे हिंदुत्ववादीची प्रखर भूमिका मांडत आहेत. यामुळे यापूर्वी त्यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांच्या घरासमोर बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही बॅग नेमकी कुणी ठेवली? बॅगमध्ये काय आहे? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची माबिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. बॅगमध्ये नक्की काय आहे? याचा शोध घेतला जात आहे. ही सगळा प्रकार नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याच्या बाहेर घडला आहे. अशा प्रकारे अज्ञाताने नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बॅग सोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी बॉम्बस्कॉड कडून बॅगची झडती घेतली जात आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी प्रचार पॅटर्नमुळे त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले होते. यातच अनेक ठिकाणी झालेल्या हिंदुत्ववादी वादग्रस्त भाषण स्टाईलमुळे नितेश राणे चर्चेत आले होते. सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीचा प्रचार जोमात आहे. निवडणुकीच्या काळातच असा प्रकार घडल्याने याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग, ट्रॉली घेऊन येणारा व्यक्ती CCTVत कैद
Next Article
advertisement
ZP Election: ज्याची भीती होती तेच झालं, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्ट काय करणार?
ज्याची भीती होती तेच झालं, ZP निवडणुकीबाबत SEC चा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्टात
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच अधिकच गडद झाला आहे

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

View All
advertisement