advertisement

South Korea emergency: दक्षिण कोरियामध्ये आणीबाणी, भारतातल्या 10 कंपन्यांना बसणार फटका, शेअरवर होणार परिणाम

Last Updated:

अलिकडच्या काळात अर्थिक संबंधांना वेग आला असून या निर्णयाचा फटका, भारतीय कंपन्यांना बसणार आहे.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी विरोधकांवर राज्यविरोधी कारवाई करत असल्याचा आरोप करत आणीबाणी घोषित केली. याचा मोठा परिणाम भारतीय कंपन्यांवर होऊ शकतो. भारत आणि दक्षिण कोरियामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात  आर्थिक व्यवहार वाढले आहेत. अलिकडच्या काळात अर्थिक संबंधांना वेग आला असून या निर्णयाचा फटका, भारतीय कंपन्यांना बसणार आहे.
2018 मध्ये वार्षिक द्विपक्षीय व्यापार 21.5 बिलियन यूएस डॉलरवर पोहोचला आहे. 2022-23 मध्ये भारत आणि कोरिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 21.46% ने यूएस डॉलर वाढून 27.8 अब्ज होईल.
टाटा मोटर्स: देवू व्यावसायिक वाहने 102 मिलियन डॉलर्समध्ये विकत घेतली. टाटा देवू (अधिकृतपणे टाटा देवू मोबिलिटी) ही एक व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनी आहे. ज्याचे मुख्यालय गुनसान, उत्तर जिओला प्रांत, दक्षिण कोरिया येथे आहे आणि ती टाटा मोटर्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही दक्षिण कोरियातील दुसरी सर्वात मोठी अवजड व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आहे.
advertisement
स्टेट बँक ऑफ इंडिया: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने दक्षिण कोरियामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे असलेली ही शाखा दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. किरकोळ बँकिंग व्यतिरिक्त, ही दक्षिण कोरियाची शाखा व्यापार वित्त, द्विपक्षीय आणि सिंडिकेटेड कर्ज आणि कॉर्पोरेट ठेवींमधील कॉर्पोरेट्सना अनेक सेवा देते.
advertisement
बँक ऑफ बडोदा: बँकेची दक्षिण कोरियामध्येही मोठी गुंतवणूक आहे. KB Financial सोबत करार केला.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी दक्षिण कोरियामध्ये कार्यरत आहे. महिंद्रा टेक कंपनीचे काम दक्षिण कोरियामध्ये आहे.
आम्ही दक्षिण कोरियातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत असं अमेरिकेकडून प्रतिक्रिया आली आहे. भारतीय शेअर बाजारावर याचे कसे पडसाद उमटतात ते पाहावं लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
South Korea emergency: दक्षिण कोरियामध्ये आणीबाणी, भारतातल्या 10 कंपन्यांना बसणार फटका, शेअरवर होणार परिणाम
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement