Mumbai News : आयुष्याची पुंजी लावली,पण घर मिळेना; अखेर वृद्ध दाम्पत्याने उचललं असं पाऊल, सगळे बघतच राहिले
Last Updated:
Mumbai News : घराचा ताबा देण्यास झालेल्या विलंबामुळे ग्राहक आयोगाने विकासासोबत असं काही केल की,या निर्णयामुळे त्रस्त वृद्ध दाम्पत्याला मोठा दिलासा मिळाला.
मुंबई : घराचा ताबा एका निवृत्त दाम्पत्याला वेळेत न दिल्याने एका बिल्डरला महाराष्ट्र राज्य ग्राह तक्रा निवारण आयोगाने मोठा धक्का दिलेला आहे. अंधेरीत राहणाऱ्या 70 वर्षीय निवृत्त दाम्पत्याला 2 कोटी 10 लाख रुपयांचा परतावा देण्याचे आदेश आयोकाडून देण्यात आले. या निर्णयामुळे दाम्पत्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
अखेर वृद्ध दाम्पत्याने उचललं असं पाऊल
अंधेरीतील या प्रकरणात निवृत्त दाम्पत्याने मेसर्स स्कायलाइन कन्स्ट्रक्शनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यांनी 2013 या वर्षीय कुर्ला येथील एका प्रकल्पात घर खरेदीसाठी 1.08 कोटी रुपये गुंतवले होते. मग या करारानुसार डिसेंबर 2015 पर्यंत यांना घराचा ताबा मिळणे आवश्यक होते. पण ठरलेल्या वेळेत घर न मिळाल्याने दाम्पत्याने अनेक वेळा पाठपुरावा केला.
advertisement
वारंवार बिल्डरकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हे दाम्पत्य अडचणीत आले होते. मग 2017 मध्ये बिल्डरने पैसे व्याजासह परत देण्याचे आश्वासन या दाम्पत्याला दिले होते पण तेही त्याने पूर्ण केले नाही. अखेर जाणून दाम्पत्याला ग्राहक आयोगाकडे धाव घेत न्याय मागितला.
या प्रकरणाची सुनावणी करताना या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी बिल्डरचीच चूक मान्य केली आणि बिल्डरला 1.08 कोटी रुपये परत या दाम्पत्याला देण्यासोबतच 2013 पासून ते प्रत्यक्ष परतावा मिळेपर्यंत 9 टक्के वार्षिक व्याज देण्याचेही आदेश दिले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : आयुष्याची पुंजी लावली,पण घर मिळेना; अखेर वृद्ध दाम्पत्याने उचललं असं पाऊल, सगळे बघतच राहिले









