तिरंग्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी झटणारा मुंबईकर, 18 वर्षांपासून करतोय अभिमानास्पद काम

Last Updated:

स्वातंत्र्य दिन तसंच प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी एक मुंबईकर तिरंग्याची प्रतिष्ठा जपण्याचं काम गेल्या 18 वर्षांपासून करतोय.

+
News18

News18

मुंबई, 16 ऑगस्ट : 76 वा स्वातंत्र्य दिन मंगळवारी संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहानं साजरा झाला. या निमित्तानं अनेकांनी तिरंगा ध्वज घेऊन मिरवला असेल. स्वातंत्र्य दिन तसंच प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी एक मुंबईकर तिरंग्याची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतोय. गेल्या 18 वर्षांपासून तो हे व्रत करत आहेत.
मुंबईतील माहीम परिसरात राहणारे प्रशांत जनार्दन पळ हे गेल्या 18 वर्षापासून न चुकता 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी मुंबईतील रस्त्यांवर पडलेले तिरंगी झेंडे गोळा करत असतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत यांनी 2005 साली ‘तिरंगा उठाव’ मोहीम सुरू केली. दादर माहीम परिसरातील पदपथ शाळा शिवाजी पार्क अशा ठिकाणी ध्वजारोहणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर या प्रभागात फिरून झेंडे गोळा करतात.
advertisement
पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज कोणाच्याही पायाखाली येऊ नये. आपल्या देशाचा अपमान होऊ नये यासाठी मी हे काम गेली 18 वर्ष करत आहे. गेल्या अठरा वर्षांमध्ये आत्तापर्यंत आम्ही 8 लाखांपेक्षा जास्त झेंडे जमा केले आहेत. या जमा केलेल्या कागदी तिरंग्यांचा वृक्षारोपण करून त्यांच्या मुळांशी तिरंग्यांचा सन्मानाने विनियोग केला जातो. विशेष म्हणजे भारतीय शहिदांच्या नावाने हे वृक्षरोपण केले जाते, असं प्रशांत यांनी सांगितलं.
advertisement
प्रशांत पळ यांच्या या कामाला आता अनेक मुंबईकरांचा पाठिंबा मिळत आहे. ‘मी प्रशांत पळ यांना रस्त्यावर राष्ट्रीय ध्वज गोळा करताना पाहिलं होतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गेली पाच वर्ष दादर वरळी टॅक्सी संघटनेतले सर्व टॅक्सी चालक आणि मी त्यांना या कामात मदत करतो, असं मनोज मिसाळ यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/मुंबई/
तिरंग्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी झटणारा मुंबईकर, 18 वर्षांपासून करतोय अभिमानास्पद काम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement