advertisement

'...मला डिवचू नका', 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याची वॉर्निंग, नक्की प्लॅन काय होता?

Last Updated:

मुंबईच्या पवई येथील स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याने पोलिसांना वॉर्निंग दिली होती.

News18
News18
गुरुवारचा दिवस मुंबईकरांसाठी धडकी भरवणारा ठरला आहे. पवईतील आरए स्टुडिओमध्ये एखाद्या चित्रपटालाही लाजवेल, अशाप्रकारचं दृश्य बघायला मिळालं. इथं रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने ऑडिशन्सच्या नावाखाली काही मुलांना स्टुडिओमध्ये बोलवून त्यांना बंदिस्त बनवून ठेवलं. सर्व मुलांना जाळून मारण्याची धमकी दिली. सरकारने आपले दोन कोटी रुपये थकवले आहेत, हेच पैसे परत मिळवण्यासाठी रोहित आर्याने हे ओलीसनाट्य घडवलं होतं. पण या मुलांची सुटका करत असताना पोलिसांनी रोहित आर्याचं एन्काऊंटर केलं. छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.
पण मृत्यूआधी रोहित आर्याने पोलिसांना वॉर्निंग दिली होती. आपल्याला काही जणांशी बोलायचं आहे. काही प्रशांची उत्तरं हवी आहेत. मी दहशतवादी नाही. माझं बोलणं झाल्यानंतर मी स्वत: बाहेर येणार आहे, असं रोहित आर्या म्हणाला होता. शिवाय माझी मागणी पूर्ण झाली नाही. तर मी या स्टुडिओला आग लावणार असल्याचं देखील त्याने सांगितलं होतं.
advertisement

रोहित आर्या नक्की काय म्हणाला?

"मी रोहित आर्या.. आत्महत्या करण्याऐवजी मी एक प्लॅन केला असून काही मुलांना होस्टेज बनवलं आहे. माझ्या जास्त काही मागण्या नाहीत. माझे काही प्रश्न आहेत. मला काही जणांशी बोलायचं आहे. काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मी दहशतवादी नाही. ना माझी काही पैशांची मागणी आहे. मला फक्त बोलायचं आहे. त्यासाठी मी या मुलांना ओलिस ठेवले."
advertisement
"मी जिवंत राहिलो किंवा नाही राहिलो तरी हा प्लॅन यशस्वी होणार. मी एकटा नाही आहे. मी एक सामान्य नागरिक आहे. मला फक्त बोलायचे आहे. अन्यथा मी या संपूर्ण जागेला आग लावणार आहे. यामध्ये मला काही झाले तर फरक पडणार नाही. पण विनाकारण मुलांना याचा त्रास होईल. याला फक्त संबंधित व्यक्तींना जबाबदार धरावे. माझे बोलणे झाल्यानंतर मी स्वतः बाहेर येणार आहे. मी फक्त बोलून त्यातून मार्ग काढणार आहे. कृपया मला विनाकारण डिवचू नका," असंही रोहित आर्या म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'...मला डिवचू नका', 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याची वॉर्निंग, नक्की प्लॅन काय होता?
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement