advertisement

मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळूनच प्या, अन्यथा धोका, BMC नं का केलं आवाहन?

Last Updated:

Mumbai Water Supply: मुंबईकरांना पुढील काही काळ पाणी गाळून आणि उकळूनच प्यावं लागणार आहे. काही भागात पाणीपुरवठ्याशी संबंधित दुरुस्ती कामांमुळे दुषित पाणी येण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळूनच प्या, अन्यथा आरोग्याला धोका!
मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळूनच प्या, अन्यथा आरोग्याला धोका!
मुंबई: उन्हाळा सुरू झाला की मुंबईकरांना पाण्याची चिंता सतावते. आता पुढील काही दिवस मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावं लागेल. तसेच पाणी उकळून आणि गाळूनच प्यावं लागणार आहे. मुंबईत विविध ठिकाणी पाणीपुरवठ्याशी संबंधित दुरुस्तीच्या कामांमुळे काही भागांत पाणीपुरवठा खंडित होणार असून, दूषित पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
वांद्रे परिसरात दुरुस्तीचं काम
एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन आणि वांद्रे पूर्व येथे असलेली 600 मिमी व्यासाची जुनी तुलसी जलवाहिनी 8 एप्रिल 2025 रोजी हटवून त्याऐवजी नवीन पाइप टाकण्याचं काम हाती घेतलं जात आहे. यामुळे ‘एच पूर्व’ विभागातील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात सायंकाळी 5 ते 7.30 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी
बोरीवली पश्चिमेकडील गोराई आणि कुलवेम परिसरात दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाच जलवाहिन्या फुटल्यामुळे पाणी दूषित झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याचा परिणाम पी उत्तर ते आर मध्य वॉर्ड परिसरात, विशेषतः मनोरी, कुलवेम आणि गोराई येथे झाला आहे.
advertisement
नागरिकांना महापालिकेचा सल्ला
1) पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा.
2) दुरुस्ती दरम्यान आणि त्यानंतर 4-5 दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे.
3) पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळूनच प्या, अन्यथा धोका, BMC नं का केलं आवाहन?
Next Article
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement