CNBC Awaaz Exclusive: G20 मधील आणखी एक मोठी बातमी! भारत आणि सौदी अरेबियामध्ये मोठा करार

Last Updated:

G20 Summit: भारत आणि सौदी अरेबियामध्ये ऊर्जा क्षेत्रासंदर्भात मोठा करार झाला आहे. या सामंजस्य कराराबद्दल अधिकृत निवेदन कधीही जारी केले जाऊ शकते.

G20 मधील आणखी एक मोठी बातमी!
G20 मधील आणखी एक मोठी बातमी!
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित G-20 शिखर परिषद दिल्लीत पार पडली. या परिषदेतून भारताने खूप काही मिळवलं आहे. G20 च्या तिसऱ्या दिवशी भारत आणि सौदी अरेबियामध्ये एका मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेदरम्यान ऊर्जा क्षेत्रासंदर्भात एक मोठा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराबद्दल अधिकृत निवेदन कधीही जारी केले जाऊ शकते.
या सामंजस्य कराराच्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये वीज पारेषण समुद्राखालून करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. पॉवर ग्रीडच्या जोडणीसाठी सौदी अरेबिया आणि भारत यांच्यात हा करार झाला आहे. या सामंजस्य कराराच्या दरम्यान, अक्षय ऊर्जा आणि विजेबाबतही करार करण्यात आला आहे. हायड्रोजन, स्टोरेज आणि ऑइल-गॅसमध्ये परस्पर गुंतवणूक वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला आहे.
advertisement
दोन्ही देशांतील संबंध सुधारतील!
सौदीचे क्राउन प्रिन्स बिन सलमान यांनी द्विपक्षीय चर्चेत सांगितले की, "भारत-सौदी अरेबिया संबंधांच्या इतिहासात कोणतेही मतभेद नव्हते. परंतु, आम्ही आमच्या देशांचे भविष्य घडवण्यासाठी आणि संधी निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत. आज आम्ही संधींवर काम करत आहोत. तुमच्या G20 शिखर परिषदेच्या व्यवस्थापनाबद्दल आणि तुम्ही केलेल्या यशाबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो, ज्यामध्ये मध्य पूर्व, भारत आणि युरोपला जोडणारा आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे, ज्याच्या उभारणीसाठी आम्ही परिश्रमपूर्वक काम करणे आवश्यक आहे.
advertisement
दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक सुविधा केंद्रे उघडतील : पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सौदी आणि भारत यांच्यातील चर्चेवर सांगितले की, स्टार्टअप आणि तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक सुविधा केंद्रे उघडली जातील.
केंद्र भांडवलदारांना त्यांच्या वित्त आणि मार्गदर्शनासाठी सहभागी करेल. येत्या 6 महिन्यांत हा प्रकल्प सुरू होईल, ज्याला वाणिज्य मंत्रालय पूर्ण सहकार्य देईल, अशी प्रतिक्रिया पीयूष गोयल यांनी दिली
advertisement
यूएईचे राजदूत काय म्हणाले?
भारताच्या G20 अध्यक्षपदावर आणि दिल्लीच्या घोषणेवर, UAE चे देशाचे राजदूत अब्दुलनासेर अलशाली म्हणाले, "भारताचे G20 अध्यक्षपद खूप यशस्वी राहिले. G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेल्या सर्व द्विपक्षीय, त्रिपक्षीय आणि बहुपक्षीय संवादांमधून तुम्ही त्याचे यश पाहू शकता." घोषणेवर एकमत साधण्याची प्रक्रिया खूप पूर्वीपासून सुरू झाली होती. ही घोषणा भारताच्या अध्यक्षतेखालील G-20 साठी योग्य असलेली घोषणा आहे, हे सुनिश्चित होईल.
view comments
मराठी बातम्या/देश/
CNBC Awaaz Exclusive: G20 मधील आणखी एक मोठी बातमी! भारत आणि सौदी अरेबियामध्ये मोठा करार
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement