Vastu Tips: दाराच्या तोंडाशीच वितुष्ट! घरात कशी राहणार सुख-शांती-आरोग्य, पहा वास्तु उपाय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi : वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळू शकते. यासाठी तुमच्या घरासमोर असणाऱ्या काही गोष्टी त्वरित काढून टाकल्या पाहिजेत.
मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात समस्या आणि उपाय दोन्ही असतात. ज्याच्या संतुलनामुळेच जीवन शक्य होते. पण, असे अनेक लोक असतात ज्यांच्या आयुष्यातील समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत, त्यांनी खूप प्रयत्न केले तरी समस्या जैसे थेच राहतात. कधी-कधी वास्तुशास्त्र यावर उपाय सापडतात. वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळू शकते. यासाठी तुमच्या घरासमोर असणाऱ्या काही गोष्टी त्वरित काढून टाकल्या पाहिजेत. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्याकडून त्या 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
1. घरासमोर किंवा आत काटेरी झाडे लावू नका - आजकाल घराच्या सजावटीच्या नावाखाली अनेक प्रकारची रोपे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किंवा घरासमोर काटेरी झाडे कधीही लावू नयेत. असे केल्याने घरातील सदस्यांची सर्व कामे ठप्प होतात आणि कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही.
2. घरासमोर विजेचा खांब असू नये - वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरासमोर विजेचा खांब असेल तर तो लवकरात लवकर हटवा. कारण यामुळे घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल कटुता निर्माण होते, तसेच घरात सतत तणावाचे आणि भांडणाचे वातावरण असते.
advertisement
3. घरासमोरील रस्ता उंच नसावा - वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरासमोरून जाणारा रस्ता तुमच्या घराच्या पृष्ठभागापेक्षा उंच असेल आणि तुमचे घर खाली असेल, तर ही परिस्थिती घरातील त्रास आणि आर्थिक तंगीचे कारण बनते. विशेष काळजी घ्या की तुमचे घर तुमच्या घरासमोरील रस्त्यापेक्षा नेहमी उंचीवर असावे.
advertisement
4. घरासमोर कचऱ्याचा ढीग ठेवू नका - वास्तुशास्त्रानुसार घराच्या आतील स्वच्छतेसोबतच बाहेरची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. तुमच्या घरासमोर कचरा साचणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि घरात प्रवेश करत नाही. त्यामुळे घरामध्ये आजार आणि गरिबी पसरू लागते.
5. घरासमोर घाण पाणी साठू देऊ नका - वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरासमोरून पाणी वाहून जाण्याची चांगली व्यवस्था असावी, याची विशेष काळजी घ्या. घरासमोर पाणी साचल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश वाढतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आर्थिक संकट, रोग आणि वितुष्ट येते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 04, 2024 11:58 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Vastu Tips: दाराच्या तोंडाशीच वितुष्ट! घरात कशी राहणार सुख-शांती-आरोग्य, पहा वास्तु उपाय







