पारंपरिक शेती परवडत नव्हती, बीडच्या युवा शेतकऱ्यानं निवडलं पैशाचं पीक, कमाई 10 लाख!
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sericulture Success: पारंपरिक शेतीला फाटा देत बीडच्या शेतकऱ्यानं वेगळा पर्याय निवडला. आता रामप्रभू बडे हे वर्षाला 10 लाखांची कमाई करत आहेत.
advertisement
बीड जिल्ह्यातील गावंदरा येथील युवक शेतकरी रामप्रभू बडे हे ऊस, कापूस, बाजरी आणि इतर पारंपरिक पिकांची लागवड करत होते. सतत बदलणारे हवामान, मजुरीचा वाढता खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी नवा पर्याय शोधला आणि रेशीम शेतीकडे वळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
रेशीम उत्पादनाच्या पहिल्याच हंगामात त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. यानंतर त्यांनी याच शेतीत अधिक गुंतवणूक करत मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या रेशीम शेतीतून दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. पारंपरिक शेतीपेक्षा हे उत्पन्न अनेक पटींनी जास्त असून शेतीचा खर्चही तुलनेने कमी असल्याचे ते सांगतात.
advertisement
रामप्रभू बडे यांच्या मते, शेतीमध्ये सातत्याने नवे प्रयोग करणे गरजेचे आहे. पारंपरिक शेतीतील तोटा पाहता शेतकऱ्यांनी पर्यायी शेती पद्धतीचा विचार केला पाहिजे. रेशीम शेतीसाठी सरकारकडून अनुदान आणि प्रशिक्षण मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी ही संधी साधून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा. (प्रशांत पवार, प्रतिनिधी)










