शेतीला जोडधंदा म्हणून देशी कोंबड्यांचे पालन, 30 दिवसांत 2 लाख कमाई, वाचा शेतकऱ्याची कहाणी
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शशिकांत यांना लहानपणापासून कुक्कुटपालन करायला आवडत होते. त्यामुळे त्यांना या कोंबड्यांविषयी माहिती असल्याने कुक्कुटपालन हा व्यवसाय 3 वर्षांपूर्वी सुरू केला.
भारतीय शेतकरी पूर्वपरंपरेपासून शेती करत असताना त्यासोबत अनेक प्रकारची जोडधंदे करत आलेला आहे. यामध्ये पशुपालन, शेळीपालन, मेंढी पालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणात आता केला जात आहे. जसे शेती प्रगत होत गेली तसे तसे शेती व्यवसायाला पूरक असलेले धंदे देखील विकसित होत गेले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यांच्या या प्रवासात अनेक चढ-उतार देखील आले. जिवंत पक्षी म्हटल्यानंतर त्यांच्यावर रोग पडणे, पक्षी मरण पावणे अशा अनेक अडचणींना सामोरे जात शशिकांत यांनी 40 कोंबड्यांचे 60 हजार कोंबड्या केल्या. आज या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची महिन्याकाठी 2 लाखापर्यंतची उलाढाल ही होत असते. तसेच यांनी आपले ग्राहक देखील नाशिक, पुणे, नगर, सापुतारा, गुजरात या ठिकाणी वाढविले आहे आणि त्यांच्या मल्हारबाग पोल्ट्रीचे नाव पोहोचविले आहे.
advertisement
advertisement










