Success Story : डोंगराळ भागातील शेतीत उत्पन्न नव्हते, MPSC ची तयारी करताना विकासने निवडला रेशीमचा मार्ग, वर्षाला 5 लाख कमाई
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
डोंगराळ भागातील शेती असल्याने पारंपरिक पिकातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. अशा परिस्थितीत पुढील वाटचाल कशी करावी हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहू लागला.
बीड जिल्ह्यातील गावंदरा या गावातील विकास आघाव हा युवक अनेक वर्षे राज्यसेवा परीक्षा पास होण्यासाठी बीड शहरात राहून तयारी करत होता. जवळपास पाच ते सहा वर्षे त्याने अभ्यासात मनापासून मेहनत घेतली. मात्र शेतीव्यतिरिक्त कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसल्याने घरचा खर्च भागवणे अवघड होत गेले. डोंगराळ भागातील शेती असल्याने पारंपरिक पिकातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. अशा परिस्थितीत पुढील वाटचाल कशी करावी हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहू लागला.
advertisement
या आर्थिक ताणातून बाहेर पडण्यासाठी विकासने स्वतः काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने रेशीम शेतीकडे (Sericulture) वळण्याचा विचार केला. सुरुवातीला त्याच्याकडे आवश्यक माहिती आणि साधनसामग्री नव्हती, मात्र यशस्वी होण्याचा निर्धार कायम होता. पारंपरिक शेती सांभाळत त्याने रेशीम शेतीचे प्रशिक्षण घेतले आणि दीड एकर क्षेत्रात प्रयोग सुरू केला. आर्थिक अडचणी असूनही त्याने कामात सातत्य ठेवले.
advertisement
मागील दोन वर्षांपासून विकास आघाव रेशीम शेती यशस्वीपणे करत आहे. त्याने सुरुवातीला मलबरी (तूत) झाडांची लागवड केली आणि रेशीम कीड पालनासाठी आवश्यक अशी व्यवस्था उभारली. पहिल्या काही महिन्यांत आव्हाने आली, परंतु सातत्य आणि योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादन वाढू लागले. रेशीम किडींचे आरोग्य, तापमान नियंत्रण आणि खाद्य व्यवस्थापन यावर त्याने विशेष लक्ष दिले आणि त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
advertisement
केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेत विकासने खर्चात बचत केली. शेती विज्ञान केंद्रातील तज्ञांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. पारंपरिक पिकाच्या तुलनेत रेशीम शेती अधिक फायदेशीर असल्याचे त्याला लक्षात आलं आणि तो पूर्णपणे या शेतीकडे वळला. समुदायातील इतर शेतकरीही आता त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले आहेत.
advertisement









