70s चा 'सायलेंट सुपरस्टार', विनोद खन्ना-अमिताभच्या स्टारडममध्ये बनवली स्वत:ची ओळख, 80s मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
1970 च्या दशकात बॉक्स ऑफिस अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्यात विभागलं होतं तेव्हा एक असा सुपरस्टार जन्माला आला ज्याने नंतर 80 चं दशक गाजवलं. तो 1980 च्या काळातील सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक बनला. कोण होता हा सायलेंट सुपरस्टार.
advertisement
advertisement
सुरुवातीला जितेंद्र यांना त्यांच्या डान्स आणि व्हाइट शूजमुळे 'जंपिंग जॅक' म्हटलं जातं होतं. पण 1974 नंतर त्यांनी आपली इमेज बदलली. 'बिदाई' आणि 'खुशबू' यांसारख्या सिनेमातून त्यांनी दाखवून दिलं की ते केवळ डान्स नाही तर गंभीर अभिनयही करू शकतात. 'धर्मवीर' सारख्या मसाला चित्रपटातून त्यांनी मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला.
advertisement
माध्यमांच्या वृत्तानुसार, जितेंद्रच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे दक्षिण भारतीय निर्मिती संस्थांसोबतचा (जसे की पद्मालय स्टुडिओ) त्याचा संबंध होता. 1974 ते 1979 साऊथ इंडियन सिनेमांच्या रिमेकमध्ये काम केलं. अमिताभ बच्चन वर्षाला दोन-तीन चित्रपट प्रदर्शित करत असताना जितेंद्र यांचे आठ ते दहा चित्रपट रिलीज व्हायचे.
advertisement
1980 हे वर्ष जितेंद्रच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. याच वर्षी त्याचा 'आशा' हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. याच काळात विनोद खन्ना यांनी ओशोंच्या वाटेवर गेले त्यांची कमी जितेंद्रने भरून काढली. जितेंद्र यांचं इंडस्ट्रीतील स्थान वाढलं. मानधनही वाढलं. या काळात ते सर्वात महागे अभिनेते होते. कारण त्यांच्याबरोबर सिनेमा केला तो 100 टक्के पैसा वसूल करतो अशी हमी निर्मात्यांना मिळाली होती.
advertisement
असे म्हटले जाते की जितेंद्र यांची सर्वात मोठी ताकद त्याची शिस्त होती. तो सकाळी लवकर सेटवर यायचे आणि दिवसातून दोन शिफ्टमध्ये काम करायचे. यामुळे 1980 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत त्याच्याकडे खूप सिनेमे होते. 'स्वर्ग नरक', 'ज्योती बने ज्वाला' आणि 'जुदाई' यांसारख्या चित्रपटांनी त्याला घराघरात पोहोचले.
advertisement









