'लोकं वेडी नाहीत की...', ए. आर. रहमान यांच्या वादग्रस्त विधानावर 'छावा'च्या लेखकाचं सणसणीत उत्तर, कडक शब्दात सुनावलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
A. R. Rahman Controversy: 'छावा' चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी समाजात फूट पाडणारा चित्रपट म्हटलं. आता यावर चित्रपटाचे लेखक ऋषी विरमानी यांनी मौन सोडलं असून, रहमान यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
advertisement
काही दिवसांपूर्वी बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी खळबळजनक दावे केले होते. ते म्हणाले होते की, "गेल्या ८ वर्षांत चित्रपटसृष्टीत सत्तेचं समीकरण बदललं असून निर्णय घेणारे लोक आता फारसे क्रिएटिव्ह राहिलेले नाहीत. 'छावा'सारखे चित्रपट समाजात फूट पाडणारे आहेत. कदाचित माझ्या धर्मामुळेही मला गेल्या काही वर्षांत हवं तसं काम मिळालं नसावे."
advertisement
advertisement
ऋषी विरमानी म्हणाले, "केवळ दोन तासांचा चित्रपट पाहून कोणाची विचारसरणी बदलेल, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. 'छावा'ला प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेम दिलं, तसं प्रेम मी गेल्या अनेक वर्षांत पाहिलं नाही. राहिला प्रश्न फूट पाडण्याचा, तर हा एक मनोरंजक चित्रपट आहे. आजची जनता खूप समजूतदार आहे, ती इतकी कच्च्या मनाची नाही की चित्रपटाने भरकटली जाईल. लोकांना काय बरोबर आणि काय चूक हे व्यवस्थित कळतं."
advertisement
advertisement
advertisement









