Mangalsutra : काळा रंग अशुभ मानला जातो, मग मंगळसूत्रात काळ्या रंगाचे मणी का असतात?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
हिंदू धर्मात विवाहित महिला या लग्नानंतर गळ्यात मंगळसूत्र घालतात. लग्नानंतर विवाहित महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र असण्याला खूप महत्व असते. परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की इतर वेळी काळा रंग अशुभ मानला जातो मग मंगळसुत्रात काळे मणीचं का असतात. मंगळसूत्रात काळे मणी असण्यामागील योग्य कारण जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
विवाहित महिलांना अनेकदा काळ्या रंगाच्या वस्तू घालण्यास मनाई केली जाते. परंतु हेच काळे मणी जेव्हा मंगळसूत्रात गुंफले जातात तेव्हा ते शुभ कार्य करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, काळे मणी राहू ग्रहाचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात. यामुळे शनीची वाईट नजर तुमच्या वैवाहिक जीवनावर पडत नाही असे म्हंटले जाते.
advertisement
मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांच्या जोडीला सोन्याचे मणी देखील असतात. सोन या धातूमध्ये हीलिंग गुणधर्म असतो, जो विवाहित महिलांना चिंता आणि ताणमुक्त ठेवतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सोन परिधान केल्याने गुरूचा प्रभाव वाढवायला मदत होते आणि वैवाहिक जीवन सुखी होतं. ( सदर मजकूर हा इंटरनेटवर असलेल्या माहितीच्या आधारे आहे. याचा न्यूज १८ मराठीशी संबंध नाही. )


