Kitchen Tricks : 'या' एका चुकीमुळं फुगत नाही चपाती! छोटासा बदल करा, टम्म फुगेल आणि बनेल मऊसूत..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
चपात्या बनवताना बऱ्याचदा त्या फुगत नाहीत, चापट किंवा पापडासारख्या कडक होतात. काहीवेळा आपल्याला कळतच नाही असं का होतं. पण एक छोटासा बदल करून आपण चपाती फुगलेली आणि मऊ बनवू शकतो.
advertisement
कणिक मळताना तुम्ही कोणत्या प्रकारचं पाणी वापरावं याचा कधी विचार केला आहेका? खरं तर चपात्या आपण साधं पाणी जसं असेल तसं वापरतो. पण इथे एक हॅक तुम्ही वापरू शकता. पाण्याचे तापमान कणकेची गुणवत्ता कमी जास्त करू शकतात. म्हणून खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरू नका. त्याऐवजी कोमट पाणी वापरा. यामुळे कणिक चांगली मळली जाईल आणि मऊ होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेस्ट देताना किंवा चपात्या बनवल्यानंतर कणिक उरली असेल ती अजिबात उघडी ठेऊ नका. कारण हवेमुळे उघड्या कणकेच्या वरचा थर कडक होतो आणि कणिक तशीच वापरल्यास चपात्यांना लाटताना भेगा पडू शकतात. म्हणून कणिक नेहमी ओल्या कापडाने झाकून ठेवावी. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)









