advertisement

नवले पुलावरील मृत्यूचे सत्र थांबणार! काय आहे सरकारचा 6 हजार कोटींचा 'मास्टर प्लॅन'?

Last Updated:
नवले पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गाचा ५ ते ६ किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. भौगोलिक रचना आणि जड वाहनांची वर्दळ यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
1/7
पुण्यातील नवले पुलावर सतत होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्चाचा भव्य 'उन्नत मार्ग' उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
पुण्यातील नवले पुलावर सतत होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्चाचा भव्य 'उन्नत मार्ग' उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
advertisement
2/7
राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत ही महत्त्वाची माहिती दिली. आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत नवले पुलावरील वाढत्या अपघातांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत ही महत्त्वाची माहिती दिली. आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत नवले पुलावरील वाढत्या अपघातांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
advertisement
3/7
त्याला उत्तर देताना योगेश कदम यांनी सांगितले की, नवले पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गाचा ५ ते ६ किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. भौगोलिक रचना आणि जड वाहनांची वर्दळ यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
त्याला उत्तर देताना योगेश कदम यांनी सांगितले की, नवले पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गाचा ५ ते ६ किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. भौगोलिक रचना आणि जड वाहनांची वर्दळ यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
advertisement
4/7
२०२२ मध्ये येथे १२ अपघात झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या १६ पर्यंत पोहोचली. विशेषतः २०२५ मध्ये एकाच भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे, जी अत्यंत चिंताजनक बाब आहे.
२०२२ मध्ये येथे १२ अपघात झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या १६ पर्यंत पोहोचली. विशेषतः २०२५ मध्ये एकाच भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे, जी अत्यंत चिंताजनक बाब आहे.
advertisement
5/7
रस्त्यावर येणारा ताण आणि तांत्रिक दोष दूर करण्यासाठी 'उन्नत मार्ग' हाच अंतिम पर्याय असल्याचे सरकारने मान्य केले आहे. या ६ हजार कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत आहे.
रस्त्यावर येणारा ताण आणि तांत्रिक दोष दूर करण्यासाठी 'उन्नत मार्ग' हाच अंतिम पर्याय असल्याचे सरकारने मान्य केले आहे. या ६ हजार कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत आहे.
advertisement
6/7
या चर्चेत आमदार शंकर जगताप यांनीही सहभाग घेऊन काही महत्त्वाच्या तांत्रिक सूचना मांडल्या.
या चर्चेत आमदार शंकर जगताप यांनीही सहभाग घेऊन काही महत्त्वाच्या तांत्रिक सूचना मांडल्या.
advertisement
7/7
नवले पुलावरील हा प्रस्तावित उन्नत मार्ग झाल्यास, स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील जड वाहतूक वेगळी होईल, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवले पुलावरील हा प्रस्तावित उन्नत मार्ग झाल्यास, स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील जड वाहतूक वेगळी होईल, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement