हिवाळा स्पेशल सुरण कंदाची भाजी, आरोग्यासाठी गुणकारी, सोप्या पद्धतीने बनवा रेसिपी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हिवाळ्यात अनेक लोकांना वाताची समस्या उद्भवते. त्यासाठी अमरावतीमधील काही भागांत सुरण कंदाची भाजी खातात. अनेकदा डॉक्टरांकडून सुद्धा ही भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो.
हिवाळ्यामध्ये अनेकांना वात ही समस्या उद्भवते. त्यामुळे अमरावतीमधील काही भागांत हिवाळ्यात सुरण कंदाचे सेवन केले जाते. सुरण कंद हा दोन प्रकारचा असतो एक गावरान आणि दुसरा जंगली. जंगली सुरण कंद हा खाण्यासाठी वापरत नाहीत. त्याचा उपयोग फक्त औषधी म्हणून केला जातो. गावरान सुरण कंद हा हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी वापरतात. प्रत्येक भागांत याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. अमरावती स्पेशल सुरण कंदाची भाजी कशी बनवतात? याबद्दल गृहिणी सुनिता घुलक्षे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
अमरावती मधील गृहिणी सुनिता घुलक्षे यांनी सांगितल्यानुसार, सुरण कंदाची भाजी बनवताना सर्वात आधी कंद धुवून घ्यायचा. त्यानंतर त्याला कोरडा करून त्याचे दोन भाग करायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे सुरण कंद कापायला घेतला की हात खाजवतात. त्यामुळे हाताला तेल लावावे किंवा मग हातात पॉलिथिन सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यानंतर सुरण कंदाची वरची साल पूर्ण काढून घ्यायची आणि त्याचे चिप्स करून घ्यायचे आहे. चिप्स हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही . मिडीयम साईजमध्ये चिप्स करून घ्यायचे आहे. ते चिप्स दिवसभर घरातच वाळत ठेवायचे आहे. एकदम कडक वाळवून घ्यायचे नाही. कडक जर वाळवून घेतले तर चिप्स जळतात.
advertisement
advertisement
advertisement
त्याच तेलात तुम्ही भाजी बनवून घेऊ शकता. सर्वात आधी तेलात कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट घालायची. ते परतवून घ्यायची आणि थोडी लाल होऊ द्यायची. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घालायची ती थोडी शिजू द्यायची. काजू आणि शेंगदाण्याची पेस्ट घालायची ती सुद्धा थोडी परतवून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट आणि इतर मसाले घालायचे. ते सुद्धा थोडा वेळ शिजू द्यायचे. टोमॅटो आणि पालक पेस्ट घालायची त्यानंतर हा मसाला तेल सोडत पर्यंत शिजून घ्यायचा आहे. त्यात लागत असेल तर थोडे पाणी घालू शकता.
advertisement
मसाला तयार झाला की, त्यात चिप्स घालायचे. ते परतवून घ्यायचे. तुम्ही यात रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी सुद्धा वापरू शकता. त्यामुळे भाजी आधिक टेस्टी बनते. त्यात पाणी घालून घ्यायचे. तुम्हाला हवा तसा रस्सा तुम्ही बनवू शकता पातळ पाहिजे असल्या जास्त पाणी घाला. त्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून उकळी काढून घ्या.
advertisement