Fried Item : तळलेले पदार्थ मऊ का पडतात? कुरकुरीत राहण्यासाठी काय उपाय? गृहिणींनो 'या' सोप्या ट्रिक्स वापरून पाहाच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Why fried food becomes soggy : पापड, चिवडा, चकली, कांदाभजी कापडते नरम? कुरकुरीत राहण्यासाठी या घरगुती टिप्स करतील मदत
संध्याकाळची वेळ झाली की आपल्याला वेध लागतात ते म्हणजे चहासोबत काहीतरी कुरकुरीत खाण्याचे. मग आपण हौसेने कांदा भजी, बटाटा वडा, चिवडा किंवा मुलांसाठी कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स तळायला घेतो. एवढच नाही तर जेवणात लागणारे पापड, कुरडई, नळ्या सारखे पदार्थ ही स्वयंपाक घरात बनतो. कढईतून गरम गरम काढताना तर ते अगदी कडक आणि छान असतात, पण पानात वाढेपर्यंत किंवा डब्यात भरेपर्यंत ते अचानक मऊ (Soggy) पडतात. त्याचा तो कुरकुरीतपणा जातो आणि सगळी मजाच हिरमुसली होते.
advertisement
आपल्यासारख्या गृहिणींना हे नेहमीच जाणवतं की, एवढ्या मेहनतीने तळलेला पदार्थ जर थोड्याच वेळात 'चामट' झाला की घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही कमी होतो. कधी पिठाचा अंदाज चुकतो, तर कधी तळण्याची पद्धत. पण घाबरू नका, तळलेले पदार्थ हॉटेलसारखे जास्त वेळ कुरकुरीत ठेवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आपण पाहूया.
advertisement
1. घाईघाईत डबा बंद करण्याची चूकआपण काय करतो? चिवडा, पापड, भजी किंवा वडे तळले की ते गरम असतानाच लगेच डब्यात भरतो किंवा वरून झाकण ठेवतो. गरम पदार्थामुळे जी वाफ तयार होते, तिचे रूपांतर पाण्यात होते आणि तो ओलावा पदार्थाला मऊ पाडतो.तळलेला पदार्थ पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच डब्यात भरा. किंवा सुरुवातीला डब्याचे झाकण अर्धे उघडे ठेवा.
advertisement
2. तेल 'कडकडीत' गरम आहे का?जर तेल पुरेसं गरम नसेल आणि तुम्ही त्यात पदार्थ टाकला, तर तो पदार्थ तेल जास्त शोषतो आणि आतून तेलकट झाल्यामुळे मऊ पडतो. याउलट खूप जास्त कडक तेल असेल तर पदार्थ बाहेरून जळतो आणि आतून कच्चा राहतो.तेल मध्यम गरम असावे. पिठाचा एक छोटा गोळा टाकल्यावर तो लगेच वर आला की समजावं तेल परफेक्ट आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








