दिवसभर फ्रेश राहायचंय? फाॅलो करा पाणी पिण्याच्या 'या' स्मार्ट सवयी, त्वचा अन् आरोग्य दोन्ही राहील टवटवीत
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून पाणी लवकर निघून जातं आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. यासाठी दिवसभर हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. विसरू नये म्हणून स्मार्ट वॉटर बॉटल्स...
advertisement
advertisement
आजकाल बाजारात अशा पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला ठराविक वेळेनंतर अलार्म वाजवून पाणी पिण्याची आठवण करून देतात. याशिवाय, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 'वॉटर रिमाइंडर ॲप' देखील डाउनलोड करू शकता. हे ॲप तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्हाला अलर्ट पाठवतं आणि तुम्ही वेळेवर पाणी पिऊ शकता. हा उपाय केवळ फायदेशीरच नाही, तर तो तुमची सवय देखील बनू शकतो.
advertisement
जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरी काम करत असाल, तर तुमच्या डेस्कवर पाण्याची मोठी बॉटल नेहमी ठेवा. ती दिसताच तुम्हाला पाणी पिण्याची आठवण येईल. संशोधनातूनही समोर आलं आहे की, जर पाणी माणसाच्या समोर ठेवलं तर तो जास्त वेळा पाणी पितो. जर तुम्ही याची रोजची सवय लावली, तर शरीर हायड्रेटेड ठेवणं सोपं जाईल.
advertisement
जर तुम्हाला साधं पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही लिंबू पाणी, पुदिना पाणी किंवा काकडीचं पाणी यांसारखं फ्लेवर्ड वॉटर पिऊ शकता. हे ड्रिंक्स केवळ चवच वाढवत नाहीत, तर शरीर हायड्रेटेड ठेवण्यासही मदत करतात. यासोबतच, नारळ पाणी आणि बेल सरबत हे देखील उन्हाळ्यात चांगले पर्याय आहेत. यांचं सेवन केल्याने तुम्हाला वारंवार पाणी पिण्याची गरज भासणार नाही, कारण ते शरीर जास्त वेळ थंड ठेवतात.
advertisement
उन्हाळ्यात जास्त पाणी असलेले पदार्थ खाणं खूप महत्त्वाचं आहे. काकडी, कलिंग, टरबूज, टोमॅटो, संत्री यांसारख्या गोष्टी केवळ शरीर थंड ठेवत नाहीत, तर तुमची त्वचाही चमकदार आणि ताजीतवानी ठेवतात. जर तुम्ही या फळांचं दिवसातून सेवन केलं, तर तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहीलच, पण त्वचेलाही नैसर्गिक चमक येईल.
advertisement