पतीचं निधन झालं अन् देवाला दोष देत बसले, एका घटनेनं बदललं आयुष्य, आता करतायेत मोठं काम!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर येथील एक महिलेने खास व्रत हाती घेतलंय. बेरील सांचीस या झोपडपट्टीतील मुलांना मोफत शिकवत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
“जेव्हा माझ्या पतीचं निधन झालं, तेव्हा मी खूप खचून गेले होते. मला काय करावं? काहीच कळत नव्हतं. त्यामुळे मी सतत देवाला दोष द्यायचे. पण एक दिवस मला देवाने सांगितलं की, तुझ्याकडे तर सर्व आहे. पण तू इतरांसाठी काहीतरी करू शकते. तेव्हापासूनच मी ठरवलं की आपण देखील काहीतरी देण्याचं काम करायचं,” असं बेरील सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
सुरुवातीला या पालकांचा बेरील यांच्यावर विश्वास नव्हता. तेव्हा त्यांनी मुलांना त्यांच्यासमोरच शिकवण्याची अट घातली. पुढे हळूहळू त्यांच्यावरती विश्वास बसायला लागला. आता त्या दर रविवारी वस्ती वरती जाऊन मुलांना शिकवण्याचं काम करतात. त्यांच्याकडून अनेक विद्यार्थी आता बारावी पास देखील झालेले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आण त त्यांचा शाळेत प्रवेश देखील करून दिला आहे. गेल्या 8 वर्षांपासून हे काम सुरू असून पुढे देखील शिकवण्याचं कार्य सुरूच ठेवणार असल्याचंही बेरील सांचीस सांगतात.