Photo: कुणाची बायको, कुणाचा भाऊ, कुणाची सून, सत्ताधाऱ्यांची घराणेशाही.... लढायला कार्यकर्ते, पदावर घरातले!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमीच चर्चेत असतो. त्याचं कारणही तसंच आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेत्यांचं राजकारण सुरू असतं. सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो किंवा अंगावर केसेस घेणं असो यासाठी कार्यकर्ते पुढे असतात. याच साठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात. मात्र हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावे, आमदार व्हावे असं नेत्यांना वाटत नाही. परिणामी कार्यकर्ते सतरंजीच उचलत राहतात आणि नेत्यांचे कुटुंबीय खुर्चीवर, मोठ्या पदावर बसतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांनी नगराध्यक्षपदाची तिकीटं घरातच ठेवून घेतली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची म्हणवली जाणारी ही निवडणूक नेत्यांची मक्तेदारी झालीय. परिणामी कार्यकर्त्यांनी सतरंजीच उचलायची का? असा प्रश्न आता विचारला जातोय. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देण्याची वेळ आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा घराणेशाहीवर कठोर प्रहार केलेत. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरूणांनी राजकारणात यावं, त्यांनी कर्तृत्वावर यश मिळवावं असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलंय. मात्र सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतही तिकीट मिळताना दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात. मात्र आता खासदार, मंत्री आणि आमदारांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारीही त्यांच्याच घरात ठेवलीय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


