विदर्भातील पारा घसरला, थंडीचा कडाका आणखी वाढणार, पाहा आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
नाशिक आणि मराठवाड्यासह आता विदर्भातही थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूरमधील किमान तापमानाचा पारा 17 अंश सेल्सिअस वर घसरलाय.
advertisement
विदर्भात पुढील काही दिवस पावसाची कुठलीही शक्यता नाही. मात्र काही भागांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, गोंदिया या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 19 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये आता गुलाबी थंडी जाणवत आहे.
advertisement
या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अंशतः ढगाळ आकाश राहणार आहे तर काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गुलाबी थंडी जाणवत आहे. अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांतील किमान तापमानात सुद्धा आता घट झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
तेथील किमान तापमान हे 19 अंश सेल्सिअस इतके असून कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे विदर्भातील सर्वच शहरांमध्ये आता गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे. पहाटेच्या वेळी विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. गेले काही दिवस विदर्भात विचित्र स्थिती बघायला मिळाली.
advertisement
आता सुद्धा काहीशी स्थिती कायम आहे. काही जिल्ह्यांमध्ये पहाटे थंडी, दुपारी उन्हाचे चटके, काही वेळातच ढगाळ वातावरण अशी स्थिती असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी कंटाळले आहेत. सद्या शेतात कपाशी आणि तूर हे पिकं आहेत. ढगाळ वातावरण तूर पिकाला नुकसान पोहचवते, त्यामुळे आता तुरी पिकांत अळी पडण्यास सुरुवात झाली आहे. नेमकं करावं तरी काय? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडलाय. शेतकऱ्यांनी वाढत्या थंडी मध्ये योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.