Navratri 2025: शारदीय नवरात्र म्हणजे काय? 9 दिवस उपवास का करतात? पूजा, विधी आणि महत्त्व
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Navratri 2025: महाराष्ट्रात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये शारदीय नवरात्रौत्सवाचाही समावेश आहे. नवरात्रीत घटस्थापना करून उपवास केले जातात. यंदा सोमवारपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर घटस्थापना आणि उपवासाचं महत्त्व याठिकाणी सांगितलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
नवरात्र महोत्सवात 9 दिवसांच्या उपवासाला विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या नियमांनी हे उपवास पूर्ण करतात. काहीजण नऊ दिवस एक भुक्त म्हणजे फक्त एक वेळ जेवण करतात. काहीजण नऊ दिवस पूर्णपणे उपवास धरुन व्रत पूर्ण करतात. काही ठिकाणी प्रतिपदा आणि अष्टमी या दोन दिवशी उपवास करुन देवीची उपासना केली जाते.
advertisement
नवरात्राच्या नवव्या माळेला खंडेनवमी असे म्हणतात. या दिवशी घरातील सर्व शस्त्रे, यंत्र आणि पुस्तकांची म्हणजेच विद्येची पूजा करण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बऱ्याच कामाच्या ठिकाणी देखील यादिवशी मशीन्स पुजली जातात. तर दुसऱ्या दिवशी अर्थात दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असतो. या दिवशी आपट्याच्या किंवा शमीच्या झाडाची पानं एकमेकांना दिली जातात.