Share Market: काही तासांत बुडले 200,00,00,00,000 रुपये, भारतातल्या IT सेक्टरमध्ये हाहाकार, कारण काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Anthropic AI च्या ऑटोमेशन टूलमुळे TCS, Infosys, HCL Tech, Wipro, Tech Mahindra यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, IT क्षेत्रात AIमुळे अस्तित्वाचा धोका निर्माण झाला.
शेअर बाजारात आज वरवर जरी शांतता दिसत असली, तरी आयटी कंपन्यांच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची (AI) वाढती ताकद. एआय आता फक्त मदतीला न राहता, चक्क माणसांची जागा घेणार की काय? या एका धास्तीने गुंतवणूकदारांनी आयटी शेअर्सची तुफान विक्री केली. परिणामी, दिग्गज भारतीय आयटी कंपन्यांचे तब्बल २ लाख कोटी रुपये अवघ्या काही तासांत मातीमोल झाले.
advertisement
या सर्व पडझडीचं मूळ अमेरिकेतली Anthropic AI या कंपनीत आहे. त्यांनी असं एक ऑफिस ऑटोमेशन टूल आणलंय, जे व्यवसायातील मोठी कामं स्वतःहून पूर्ण करू शकतं. "जर उद्या एआय स्वतःच सॉफ्टवेअर बनवायला लागलं आणि बिझनेस सांभाळू लागलं, तर मग आपल्या आयटी कंपन्यांना काम कोण देणार?" या एका साध्या पण भीषण प्रश्नाने जगभरातील मार्केट हादरलं.
advertisement
advertisement
advertisement
ज्या कंपन्या 'सर्व्हिस' किंवा सॉफ्टवेअरच्या जोरावर चालतात, त्यांच्या अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. जानेवारी महिन्यातच या सेक्टरमध्ये १५ टक्क्यांची घसरण झाली आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण पिढीसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी हा केवळ शेअर्सचा आकडा नसून, येणाऱ्या काळातील बदलाची एक मोठी धोक्याची घंटा आहे.
advertisement










