advertisement

Ration Card: 250000 लोकांना मिळणार नाही रेशनचं धान्य? प्रशासनाने दिला कडक इशारा, तुमचं नाव तर नाही?

Last Updated:
गोंदियात रेशन कार्ड धारकांची ई-केवायसीसाठी धावपळ, वेळेत काम न केल्यास नाव कापलं जाणार!
1/6
गोंदिया: शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात अद्यापही २ लाख ३७ हजार लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर वेळेत ई-केवायसी केली नाही, तर अशा लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत मिळणारे स्वस्त धान्य कायमचे बंद होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गोंदिया: शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात अद्यापही २ लाख ३७ हजार लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर वेळेत ई-केवायसी केली नाही, तर अशा लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत मिळणारे स्वस्त धान्य कायमचे बंद होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
advertisement
2/6
खाद्य व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. अनेकदा कुटुंबातील काही सदस्यांची नावे रेशन कार्डवर असतात, पण ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहत नाहीत किंवा त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक नसते.
खाद्य व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. अनेकदा कुटुंबातील काही सदस्यांची नावे रेशन कार्डवर असतात, पण ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहत नाहीत किंवा त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक नसते.
advertisement
3/6
अशा 'बोगस' किंवा अनुपस्थित लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही मोठी संख्या अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहे.
अशा 'बोगस' किंवा अनुपस्थित लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही मोठी संख्या अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहे.
advertisement
4/6
जे लाभार्थी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांची नावे रेशन कार्डमधून कायमची हटवली जाऊ शकतात किंवा त्यांचे रेशन वितरण तातडीने बंद केले जाऊ शकते. जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ लाख १३ हजार लाभार्थ्यांनी यशस्वीपणे ई-केवायसी पूर्ण केली आहे. २ लाख ३७ हजार लाभार्थी अद्यापही प्रलंबित आहेत.
जे लाभार्थी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांची नावे रेशन कार्डमधून कायमची हटवली जाऊ शकतात किंवा त्यांचे रेशन वितरण तातडीने बंद केले जाऊ शकते. जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ लाख १३ हजार लाभार्थ्यांनी यशस्वीपणे ई-केवायसी पूर्ण केली आहे. २ लाख ३७ हजार लाभार्थी अद्यापही प्रलंबित आहेत.
advertisement
5/6
शासनाने सर्वांना संधी मिळावी यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे, जेणेकरून कोणीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये. ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप e-KYC केलेले नाही, त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यातील तांत्रिक अडचणी आणि धान्याचा पुरवठा खंडित होणार नाही..
शासनाने सर्वांना संधी मिळावी यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे, जेणेकरून कोणीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये. ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप e-KYC केलेले नाही, त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यातील तांत्रिक अडचणी आणि धान्याचा पुरवठा खंडित होणार नाही.
advertisement
6/6
अन्यथा २ लाख ३७ हजार लोकांना धान्य मिळणार नाही. याशिवाय रेशन कार्ड बंद होऊ शकतं ते वेगळंच आणि ते सुरू करण्यासाठी पुन्हा कागदोपत्री प्रक्रिया करावी लागेल आणि त्यातून होणारा मनस्ताप जास्त असेल. त्यामुळे लगेच E KYC करुन घ्या असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
अन्यथा २ लाख ३७ हजार लोकांना धान्य मिळणार नाही. याशिवाय रेशन कार्ड बंद होऊ शकतं ते वेगळंच आणि ते सुरू करण्यासाठी पुन्हा कागदोपत्री प्रक्रिया करावी लागेल आणि त्यातून होणारा मनस्ताप जास्त असेल. त्यामुळे लगेच E KYC करुन घ्या असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement