पुन्हा होणार का नोटबंदी? ATM मधून काढता येणार नाहीत 500 च्या नोटा, का होतेय चर्चा आणि खरं काय?

Last Updated:
खिशात ५०० च्या नोटा आहेत? मग ही बातमी वाचाच! मार्च २०२६ पासून खरंच होणार का नवी नोटबंदी? सोशल मीडियावरील 'त्या' मेसेजचं सत्य आलं समोर; वाचा सरकार काय म्हणतंय...
1/6
८ नोव्हेंबर २०१६ ची ती थंडीची रात्र आजही अंगावर काटा आणणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आणि बघता बघता संपूर्ण देशाचा वेग मंदावला. स्वतःच्याच कष्टाच्या पैशांसाठी लोक बँकांच्या रांगेत उभे असलेले चित्र आपण सर्वांनी पाहिले आहे.
८ नोव्हेंबर २०१६ ची ती थंडीची रात्र आजही अंगावर काटा आणणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आणि बघता बघता संपूर्ण देशाचा वेग मंदावला. स्वतःच्याच कष्टाच्या पैशांसाठी लोक बँकांच्या रांगेत उभे असलेले चित्र आपण सर्वांनी पाहिले आहे.
advertisement
2/6
आता या घटनेला १० वर्षे पूर्ण होत असताना, पुन्हा एकदा सोशल मीडियावर नोटबंदी होणार असल्याचे मेसेज फिरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एक मेसेज वेगाने व्हायरल होत असून, त्यात दावा केला जात आहे की सरकार मार्च २०२६ पासून ५०० रुपयांच्या नोटा बंद करणार आहे.
आता या घटनेला १० वर्षे पूर्ण होत असताना, पुन्हा एकदा सोशल मीडियावर नोटबंदी होणार असल्याचे मेसेज फिरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एक मेसेज वेगाने व्हायरल होत असून, त्यात दावा केला जात आहे की सरकार मार्च २०२६ पासून ५०० रुपयांच्या नोटा बंद करणार आहे.
advertisement
3/6
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजनुसार, केंद्र सरकार पुन्हा एकदा मोठा 'डिजिटल स्ट्राईक' करण्याच्या तयारीत आहे. दाव्यानुसार, मार्च २०२६ नंतर एटीएममधून ५०० च्या नोटा बाहेर येणे बंद होईल आणि हळूहळू या नोटा चलनातून पूर्णपणे बाहेर काढल्या जातील.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजनुसार, केंद्र सरकार पुन्हा एकदा मोठा 'डिजिटल स्ट्राईक' करण्याच्या तयारीत आहे. दाव्यानुसार, मार्च २०२६ नंतर एटीएममधून ५०० च्या नोटा बाहेर येणे बंद होईल आणि हळूहळू या नोटा चलनातून पूर्णपणे बाहेर काढल्या जातील.
advertisement
4/6
या बातमीमुळे अशा लोकांची झोप उडाली आहे ज्यांचा रोख व्यवहारांवर जास्त भर असतो. छोटे व्यापारी, गृहिणी आणि ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा २०१६ सारखी परिस्थिती ओढवेल की काय, या भीतीने ग्रासले आहेत.
या बातमीमुळे अशा लोकांची झोप उडाली आहे ज्यांचा रोख व्यवहारांवर जास्त भर असतो. छोटे व्यापारी, गृहिणी आणि ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा २०१६ सारखी परिस्थिती ओढवेल की काय, या भीतीने ग्रासले आहेत. "खरोखरच मार्च २०२६ नंतर या नोटा केवळ कागदाचा तुकडा उरणार का?" असे प्रश्न विचारणारे फोन कॉल एकमेकांना केले जात आहेत.
advertisement
5/6
फॅक्ट-चेक एजन्सी 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो' (PIB)ने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या दाव्याची सखोल चौकशी करुन हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं पीआयबीने सांगितलं. ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही विचार किंवा योजना नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही ५०० रुपयांची नोट पूर्णपणे सुरक्षित आहे असं सांगितलं आहे. लोकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पुढे फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सरकारने केले आहे.
फॅक्ट-चेक एजन्सी 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो' (PIB)ने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या दाव्याची सखोल चौकशी करुन हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं पीआयबीने सांगितलं. ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही विचार किंवा योजना नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही ५०० रुपयांची नोट पूर्णपणे सुरक्षित आहे असं सांगितलं आहे. लोकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पुढे फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सरकारने केले आहे.
advertisement
6/6
५०० ची नोट ही 'लीगल टेंडर' असून ती नेहमीप्रमाणे बाजारात स्वीकारली जाईल. यापूर्वी जून २०२५ मध्येही अशाच प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. तेव्हा हे प्रकरण संसदेपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सभागृहात अधिकृत निवेदन दिले होते की, सरकारचा ५०० ची नोट बंद करण्याचा कोणताही विचार नाही.
५०० ची नोट ही 'लीगल टेंडर' असून ती नेहमीप्रमाणे बाजारात स्वीकारली जाईल. यापूर्वी जून २०२५ मध्येही अशाच प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. तेव्हा हे प्रकरण संसदेपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सभागृहात अधिकृत निवेदन दिले होते की, सरकारचा ५०० ची नोट बंद करण्याचा कोणताही विचार नाही.
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement