Weather Alert: कोकणात पावसाला ब्रेक! मुंबई–ठाण्याला दिलासा, रायगडमध्ये वेगळाच इशारा

Last Updated:
Mumbai Rain: गेल्या 2 दिवसांत कोकणातील पावसाचा जोर ओसरला आहे. आज मध्यम पावसाची शक्यता असून एका जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत चालला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात सलग अनेक दिवस मुसळधार पावसानंतर आता हवामान विभागाने थोडा दिलासा दिला आहे. आज, 24 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी साधारण स्वरूपाचा पाऊस पडेल. फक्त रायगड जिल्ह्यास यलो अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये (मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) कोणताही अलर्ट नाही.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत चालला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात सलग अनेक दिवस मुसळधार पावसानंतर आता हवामान विभागाने थोडा दिलासा दिला आहे. आज, 24 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी साधारण स्वरूपाचा पाऊस पडेल. फक्त रायगड जिल्ह्यास यलो अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये (मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) कोणताही अलर्ट नाही.
advertisement
2/5
मुंबईत आज पावसाच्या हलक्या-फुलक्या सरी दिसून येतील. मुसळधार पावसाची शक्यता नसल्याने लोकल व बस वाहतुकीवर परिणाम होणार नाही. दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी पडतील. तापमान किमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज पावसाच्या हलक्या-फुलक्या सरी दिसून येतील. मुसळधार पावसाची शक्यता नसल्याने लोकल व बस वाहतुकीवर परिणाम होणार नाही. दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी पडतील. तापमान किमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाणे या भागातही आज मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. हवामान विभागानुसार दिवसभर आभाळ ढगाळ राहील आणि हलक्या सरी पडतील. कोणताही अलर्ट नसल्याने नागरिकांना फारसा त्रास होणार नाही.
नवी मुंबई आणि ठाणे या भागातही आज मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. हवामान विभागानुसार दिवसभर आभाळ ढगाळ राहील आणि हलक्या सरी पडतील. कोणताही अलर्ट नसल्याने नागरिकांना फारसा त्रास होणार नाही.
advertisement
4/5
24 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहणार आहे. हवामान खात्याने या भागाला कोणताही अलर्ट दिलेला नाही. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत दुपारनंतर रिमझिम पाऊस अनुभवता येईल. तापमान 25 ते 30 अंश सेल्सियसदरम्यान राहील आणि आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने वातावरणात उकाडा जाणवेल. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग 20 ते 25 किमी प्रतितास इतका असू शकतो, परंतु तो धोकादायक पातळीवर नाही
24 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहणार आहे. हवामान खात्याने या भागाला कोणताही अलर्ट दिलेला नाही. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत दुपारनंतर रिमझिम पाऊस अनुभवता येईल. तापमान 25 ते 30 अंश सेल्सियसदरम्यान राहील आणि आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने वातावरणात उकाडा जाणवेल. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग 20 ते 25 किमी प्रतितास इतका असू शकतो, परंतु तो धोकादायक पातळीवर नाही
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील हवामान तुलनेने शांत राहणार आहे. रायगड जिल्ह्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असून दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नसला तरी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग सामान्य असल्याने मच्छीमारांना फारसा अडथळा नाही. मात्र रायगड जिल्ह्यात अलर्ट असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोकण किनारपट्टीवरील हवामान तुलनेने शांत राहणार आहे. रायगड जिल्ह्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असून दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नसला तरी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग सामान्य असल्याने मच्छीमारांना फारसा अडथळा नाही. मात्र रायगड जिल्ह्यात अलर्ट असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement