आजचं हवामान: महाराष्ट्रात वारं फिरलं, कोकणात पावसाचा ब्रेक, मुंबई-ठाण्यात कोणता अलर्ट?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: मुंबईसह महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस होणार की वेगळीच स्थिती राहणार जाणून घेऊ.
गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आज, 30 सप्टेंबर 2025, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. हवामान विभागानुसार आज या सर्व भागांत मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही. नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून अनुभवलेला मुसळधार पावसाचा तडाखा आज थोडा कमी होणार आहे.
advertisement
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस आज थांबला असून वातावरणात विश्रांती आहे. सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण आहे पण पावसाचा जोर दिसत नाही. दिवसभरात हवा तुलनेने स्थिर राहील. आजचे कमाल तापमान अंदाजे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आहे. वाऱ्याचा वेग सुमारे 12-15 किमी प्रतितास इतका नोंदवला जाईल. दमट हवामानामुळे उकाडा जाणवेल.
advertisement
advertisement
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकोकण किनारपट्टीवरील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम होता. मात्र आज पावसाला थोडी विश्रांती मिळाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, पण पावसाचा जोर थांबलेला दिसतो. काही ठिकाणी हलक्या रिमझिम सरी पडू शकतात, तरी मोठा पाऊस नाही. आजचे तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग 12-15 किमी प्रतितास इतका असेल. दमट हवामानामुळे किनारी भागांत उकाडा अधिक जाणवेल.







