Weather Alert: कोकणात धो धो सुरूच, मुंबईत बदलली हवा, ठाण्यासह 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: कोकणात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा कोकणातील 5 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून मुंबईत वेगळीच स्थिती राहील.
गणपती बाप्पाच्या स्वागताचा माहोल रंगला असताना पावसानेही आपली साथ कायम ठेवली आहे. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा जोर जाणवत होता, पण आज मुंबईत परिस्थिती काहीशी स्थिर आहे. तरीही ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
advertisement
मुंबईत आज हवामान तुलनेने शांत आहे. सकाळपासून अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत, मात्र मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. शहरात पाणी साचलेले नाही आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. दिवसभर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके राहील. वाऱ्याचा वेग साधारण 10 ते 15 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून काही भागांत जोरदार पाऊस सुरू असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23-24 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 28-29 अंश सेल्सिअस असेल. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.


