Weather Alert: कोकणात धो धो सुरूच, मुंबईत बदलली हवा, ठाण्यासह 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Mumbai Rain: कोकणात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा कोकणातील 5 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून मुंबईत वेगळीच स्थिती राहील.
1/5
.गणपती बाप्पाच्या स्वागताचा माहोल रंगला असताना पावसानेही आपली साथ कायम ठेवली आहे. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा जोर जाणवत होता, पण आज मुंबईत परिस्थिती काहीशी स्थिर आहे. तरीही ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
गणपती बाप्पाच्या स्वागताचा माहोल रंगला असताना पावसानेही आपली साथ कायम ठेवली आहे. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा जोर जाणवत होता, पण आज मुंबईत परिस्थिती काहीशी स्थिर आहे. तरीही ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
2/5
ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून दुपारनंतर पावसाचा जोर किंचित वाढू शकतो. किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस अपेक्षित आहे. वारे पश्चिमेकडून वाहणार असून त्यांचा वेग साधारण 15-18 किमी प्रतितास असेल.
ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून दुपारनंतर पावसाचा जोर किंचित वाढू शकतो. किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस अपेक्षित आहे. वारे पश्चिमेकडून वाहणार असून त्यांचा वेग साधारण 15-18 किमी प्रतितास असेल.
advertisement
3/5
.मुंबईत आज हवामान तुलनेने शांत आहे. सकाळपासून अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत, मात्र मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. शहरात पाणी साचलेले नाही आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. दिवसभर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके राहील. वाऱ्याचा वेग साधारण 10 ते 15 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज हवामान तुलनेने शांत आहे. सकाळपासून अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत, मात्र मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. शहरात पाणी साचलेले नाही आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. दिवसभर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके राहील. वाऱ्याचा वेग साधारण 10 ते 15 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ठाणे व नवी मुंबईपेक्षा थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार सरी कोसळू शकतात. हवामान विभागाने या भागासाठी येलो अलर्ट दिला आहे. तापमान किमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल 28 अंश सेल्सिअस असेल. वाऱ्याचा वेग साधारण 20 किमी प्रतितास राहील.
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ठाणे व नवी मुंबईपेक्षा थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार सरी कोसळू शकतात. हवामान विभागाने या भागासाठी येलो अलर्ट दिला आहे. तापमान किमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल 28 अंश सेल्सिअस असेल. वाऱ्याचा वेग साधारण 20 किमी प्रतितास राहील.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून काही भागांत जोरदार पाऊस सुरू असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23-24 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 28-29 अंश सेल्सिअस असेल. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून काही भागांत जोरदार पाऊस सुरू असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23-24 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 28-29 अंश सेल्सिअस असेल. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement