Weather Alert: कोकणात पुन्हा पाऊस, 48 तास महत्त्वाचे, मुंबई-ठाण्यातून मोठं अपडेट

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. काही जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबई, ठाण्यातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
गेल्या दोन–तीन दिवसांत कोकणपट्टीवर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या तर काही भागांत पूर्ण विश्रांती होती. पण आज पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी केलेला नाही, मात्र या भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या दोन–तीन दिवसांत कोकणपट्टीवर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या तर काही भागांत पूर्ण विश्रांती होती. पण आज पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी केलेला नाही, मात्र या भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज वातावरण अंशतः ढगाळ राहील. अधूनमधून रिमझिम सरी बरसण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांतील पावसाने दिलासा मिळाल्यानंतर आज मुसळधार पावसाचा धोका नाही. ठाणे व नवी मुंबई परिसरातही हवामान दमट राहील आणि हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. तापमान कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज वातावरण अंशतः ढगाळ राहील. अधूनमधून रिमझिम सरी बरसण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांतील पावसाने दिलासा मिळाल्यानंतर आज मुसळधार पावसाचा धोका नाही. ठाणे व नवी मुंबई परिसरातही हवामान दमट राहील आणि हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. तापमान कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
पालघर जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी राहील. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. वार्‍याचा वेग मंद राहील तर वातावरण दमट व उकाड्याचं असेल. आज कोणताही अलर्ट नसल्याने मुसळधार पावसाचा धोका नाही. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान 24 अंश सेल्सिअस अपेक्षित आहे.
पालघर जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी राहील. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. वार्‍याचा वेग मंद राहील तर वातावरण दमट व उकाड्याचं असेल. आज कोणताही अलर्ट नसल्याने मुसळधार पावसाचा धोका नाही. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान 24 अंश सेल्सिअस अपेक्षित आहे.
advertisement
4/5
रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मागील काही दिवसांपासून इथे पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी मुसळधार सरी झाल्या आहेत. आजही काही भागांत जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणकिनारी राहणाऱ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. कमाल तापमान सरासरी 28–29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24–25 अंश सेल्सिअस राहील.
रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मागील काही दिवसांपासून इथे पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी मुसळधार सरी झाल्या आहेत. आजही काही भागांत जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणकिनारी राहणाऱ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. कमाल तापमान सरासरी 28–29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24–25 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/5
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी अधूनमधून सरी बरसतील. आकाश अंशतः ढगाळ राहील व दमट हवामान जाणवेल. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाही. दरम्यान, पुढील 48 तास कोकणात पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर मात्र हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी अधूनमधून सरी बरसतील. आकाश अंशतः ढगाळ राहील व दमट हवामान जाणवेल. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाही. दरम्यान, पुढील 48 तास कोकणात पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर मात्र हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहे.
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement