Weather Alert: 'ते' दृश्य दिसलं तर घरीच थांबा! 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर तुफानी संकट, 31 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात मार्चअखेर अवकाळी पाऊस थैमान घालत असल्याचे चित्र आहे. आज 31 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
मार्चअखेर महाराष्ट्रावर अवकाळीचं भयंकर संकट घोंघावत आहे. सोसाट्याचा वारा, विजांसह जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे धोका वाढला आहे. 31 मार्च रोजी ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 13 जिल्ह्यांना ऑरेंज तर 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्याला अस्मानी संकटाचा धोका जास्त आहे. मंगळवारी या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा घाटभाग, तसेच कोल्हापूरला यलो अलर्ट असेल. या काळात वादळी वारे आणि विजांसह पाऊस आणि गारपिटीचा धोका आहे. तापमान 35-38 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









