Weather Alert : वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
30 मे रोजी देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मे महिन्याच्या अखेरीस सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यातील विविध भागांत पावसामुळे शेतीचे नुकसान झालेत. गेल्या 24 तासांत सुद्धा राज्यात जोरदार पाऊस झालाय. 30 मे रोजी देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहुयात, पुढील 24 तासांत राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
विदर्भात सर्वच जिल्ह्यांना 30 मे रोजी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 30 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या सर्वच भागांत हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. मुंबईत 30 मे रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छ्त्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील इतर उर्वरित जिल्ह्यांत म्हणजेच जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या सर्व जिल्ह्यांत 30 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement