Rice : पांढरा की ब्राऊन राईस? वजन कमी आणि शुगर कंट्रोलसाठी 'हा' तांदूळ आहे सर्वात बेस्ट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंच भात सोडणे हा एकमेव पर्याय आहे? की आपण चुकीचा तांदूळ निवडतोय? भारतात तांदळाच्या हजारो जाती आहेत. त्यापैकी कोणत्या जाती वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी 'सुपरफूड' ठरतात, हे आज आपण वैज्ञानिक आधारावर पाहणार आहोत.
भारतीय जेवणाची ताटं ही भाताशिवाय अपूर्ण आहेत. 'वरण-भात', 'दाल-खिचडी' किंवा 'मसालेभात' हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य भाग. पण अलीकडच्या काळात 'फिटनेस' आणि 'डायबिटीज' या शब्दांनी आपल्याला भातापासून दूर नेले आहे. "भात खाल्ला की वजन वाढतं" किंवा "भातामुळे साखर वाढते" हे ऐकून अनेकांनी भात खाणेच सोडले आहे.
advertisement
advertisement
रक्तातील साखर आणि वजन वाढण्याचे मुख्य कारण: ग्लायसेमिक इंडेक्स (GI)कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील साखर किती वेगाने वाढते, हे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) वरून ठरते. पांढऱ्या तांदळावर प्रक्रिया (Polishing) केल्यामुळे त्याचा GI वाढतो (70 पेक्षा जास्त), ज्यामुळे साखर झपाट्याने वाढते आणि इन्सुलिनच्या प्रक्रियेमुळे चरबी साठते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
3. तज्ज्ञांचे मत काय आहे?सह्याद्री हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञांनुसार "तांदूळ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, तर त्याचे प्रमाण आणि प्रकार बदलणे महत्त्वाचे आहे. पांढऱ्या तांदळाऐवजी अनपॉलिश्ड (Unpolished) किंवा हातसडीचा तांदूळ वापरल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते. तसेच, भात खाताना तो डाळ आणि भरपूर पालेभाज्यांसोबत खावा, जेणेकरून त्यातील कर्बोदकांचे पचन सावकाश होईल."
advertisement
4. भात खाण्याची 'स्मार्ट' पद्धतजर तुम्हाला पांढरा भातच आवडत असेल, तरीही तुम्ही तो आरोग्यदायी बनवू शकता:स्टार्च काढून टाका: भात उकळताना त्याचे जास्तीचे पाणी (पेज) काढून टाका, यामुळे कॅलरीज कमी होतात.एका वेळी 1 वाटीपेक्षा जास्त भात खाऊ नका.भातासोबत दही, पनीर, कडधान्ये किंवा अंडी खा. यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही.नवीन तांदळापेक्षा 1 वर्ष जुना तांदूळ पचायला हलका आणि साखर वाढवण्यासाठी कमी कारणीभूत ठरतो.
advertisement
advertisement








