advertisement

Weather Alert: मार्चच्या मध्यावर धोका वाढला, महाराष्ट्रावर नवं संकट, 72 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 72 तासांसाठी काही भागात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट आहे.
1/7
महाराष्ट्रात उन्हाचा पारा चाळिशी पार गेला असून गेल्या आठवड्याभरात उष्णतेच्या लाटेचे चटके सहन करावे लागले. या आठवड्यात राज्यावर हवामानाचं नवं संकट घोंघावत आहे. पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 16 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रसह विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
महाराष्ट्रात उन्हाचा पारा चाळिशी पार गेला असून गेल्या आठवड्याभरात उष्णतेच्या लाटेचे चटके सहन करावे लागले. या आठवड्यात राज्यावर हवामानाचं नवं संकट घोंघावत आहे. पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 16 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रसह विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
गेल्या काही दिवसांपासून कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट कायम आहे. मार्चच्या मध्यावर हवामानात मोठे बदल जाणवत असून हवामान कोरडे राहील. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 16 मार्चला मुंबईसह उत्तर कोकणात कोरडे हवामान राहील.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट कायम आहे. मार्चच्या मध्यावर हवामानात मोठे बदल जाणवत असून हवामान कोरडे राहील. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 16 मार्चला मुंबईसह उत्तर कोकणात कोरडे हवामान राहील.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सर्वच जिल्ह्यांतील तापमानात काहीशी घट झाली आहे. उष्णतेची लाट ओसरली असून आता अवकाळी संकट घोंघावत आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. 16 मार्चला सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सर्वच जिल्ह्यांतील तापमानात काहीशी घट झाली आहे. उष्णतेची लाट ओसरली असून आता अवकाळी संकट घोंघावत आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. 16 मार्चला सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्याला देखील उष्णतेच्या लाटेनंतर अवकाळी संकटाचा सामना करावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील 24 तासांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागेल. कमाल तापमान 34-38 अंशांवर राहील.
मराठवाड्याला देखील उष्णतेच्या लाटेनंतर अवकाळी संकटाचा सामना करावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील 24 तासांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागेल. कमाल तापमान 34-38 अंशांवर राहील.
advertisement
5/7
विदर्भात सोमवारपासून अवकाळी संकटाचा धोका वाढणार आहे. ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 38-41 अंशांच्या दरम्यान राहील. त्यामुळे काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल.
विदर्भात सोमवारपासून अवकाळी संकटाचा धोका वाढणार आहे. ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 38-41 अंशांच्या दरम्यान राहील. त्यामुळे काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल.
advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता कायम आहे. 16 मार्च रोजी नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. कमाल तापमान 37 ते 40 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका आणि वादळी पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता कायम आहे. 16 मार्च रोजी नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. कमाल तापमान 37 ते 40 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका आणि वादळी पावसाचा अंदाज आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात उष्णतेच्या लाटेने हैराण केल्यानंतर दुसऱ्या पंधरवाड्याची सुरुवात अवकाळी संकटाने होत आहे. 16 मार्चपासून 72 तास राज्यात अस्मानी संकटाचा धोका राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला आलेली पिके आणि फळबागांची योग्य काळजी घ्यावी लागेल. तसेच उष्णतेचा पारा अधिक असल्याने आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल.
दरम्यान, मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात उष्णतेच्या लाटेने हैराण केल्यानंतर दुसऱ्या पंधरवाड्याची सुरुवात अवकाळी संकटाने होत आहे. 16 मार्चपासून 72 तास राज्यात अस्मानी संकटाचा धोका राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला आलेली पिके आणि फळबागांची योग्य काळजी घ्यावी लागेल. तसेच उष्णतेचा पारा अधिक असल्याने आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल.
advertisement
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी? एक्सपर्टनी सांगितले नवे कॅल्क्युलेशन
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी?
  • 8व्या वेतन आयोगाबाबत तज्ज्ञांचा मोठा अंदाज

  • कोणाला किती फायदा?

  • या तारखेपासून मिळणार एरिअर

View All
advertisement