Weather Alert : 'सूर्या'ची नजर फक्त महाराष्ट्रावर, पारा 'फुटणार', 14 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
महाराष्ट्रात 10 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात 10 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात तापमान 37-41 अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








