Weather Alret : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, पुन्हा बर्फासारखी थंडी पडणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गेले चार दिवस राज्यात थंडीची लाट होती. 14 डिसेंबरपासून राज्यातील थंडीची लाट ओसरली, तरीही थंडीचा कडाका कायम आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
गेले चार दिवस राज्यात थंडीची लाट होती. 14 डिसेंबरपासून राज्यातील थंडीची लाट ओसरली, तरीही थंडीचा कडाका कायम आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. जेऊर येथे राज्यातील सर्वात कमी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच इतरही जिल्ह्यांत 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले. पाहुयात, 16 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त आहे. नाशिकमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. इतरही जिल्ह्यांतील तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांत 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
विदर्भातही थंडीचा कडाका वाढलाय. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. विदर्भातील गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement










