ग्रहण संपलं तरी संकट टळलं नाही! आज चुकूनही करू नका 'ही' काम, अन्यथा सोसावे लागतील हाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
काल 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण पार पडले. 6 वाजून 48 मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष काळ झाला असला, तरी ज्योतिषशास्त्राच्या मते ग्रहणाचे 'वेध' आणि त्याचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहतो.
काल 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण पार पडले. 6 वाजून 48 मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष काळ झाला असला, तरी ज्योतिषशास्त्राच्या मते ग्रहणाचे 'वेध' आणि त्याचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहतो. विशेषतः सिंह राशीत लागलेल्या या ग्रहणामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निवळण्यासाठी काही काळ जावा लागतो. अशा स्थितीत, ग्रहण संपले म्हणून गाफील राहू नका. जर तुम्ही पुढील काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
अशुद्ध अवस्थेत देवघराला स्पर्श: ग्रहण संपल्यानंतर अनेकजण घाईघाईने दिवा लावण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी देवघराकडे जातात. मात्र, जोपर्यंत तुम्ही 'मोक्ष स्नान' म्हणजेच शुद्धीकरण स्नान करत नाही आणि संपूर्ण देवघर गंगाजलाने स्वच्छ करत नाही, तोपर्यंत मूर्तींना स्पर्श करू नका. अशुद्ध अवस्थेत केलेली पूजा शुभ फळ देण्याऐवजी दोष निर्माण करू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गर्भवती महिलांनी गाफील राहू नये: जरी ग्रहण संपले असले तरी, गर्भवती महिलांनी पुढील 24 तास जड कामे करणे किंवा जास्त प्रवास करणे टाळावे. ग्रहणाचा प्रभाव हळूहळू ओसरतो, त्यामुळे विश्रांती घेणे आणि नामस्मरण सुरू ठेवणे बाळाच्या आरोग्यासाठी हिताचे ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








