उद्या रंगपंचमीला करा 'हे' खास उपाय, लव्ह लाइफमध्ये पुन्हा येईल गोडवा, बिघडलेल्या नात्यात येईल प्रेमाची बहार!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
होळीचा आनंद साजरा केल्यानंतर आता वेध लागले आहेत ते रंगपंचमीचे. ज्योतिषशास्त्रानुसार, रंगपंचमीचा सण केवळ रंगांच्या उधळणीसाठी नसून, तो आपल्या आयुष्यातील नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा ओलावा निर्माण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
होळीचा आनंद साजरा केल्यानंतर आता वेध लागले आहेत ते रंगपंचमीचे. ज्योतिषशास्त्रानुसार, रंगपंचमीचा सण केवळ रंगांच्या उधळणीसाठी नसून, तो आपल्या आयुष्यातील नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा ओलावा निर्माण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. जर तुमच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक आयुष्यात काही काळ दुरावा आला असेल, तर यंदाची रंगपंचमी तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन आली आहे.
advertisement
राधा-कृष्णाला गुलाबी गुलाल अर्पण करा: राधा-कृष्ण हे प्रेमाचे सर्वोच्च प्रतीक मानले जातात. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी राधा-कृष्णाच्या मूर्तीला किंवा फोटोला गुलाबी रंगाचा नैसर्गिक गुलाल अर्पण करा. गुलाबी रंग हा प्रेमाचा आणि स्नेहाचा रंग आहे. यामुळे तुमच्या नात्यातील कडवटपणा दूर होऊन प्रेमाची नवी सुरुवात होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य: प्रेमसंबंधात स्थिरता आणण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीला आणि विष्णू देवाला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. हा प्रसाद जोडीदारासोबत मिळून खाल्ल्याने नात्यात विलक्षण गोडवा निर्माण होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









