Team India : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेरच झाली असती, 5 मुमेंट 5 जण... ज्यांनी एकहाती गेम फिरवला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाने लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 96 रननी दणदणीत विजय मिळवत टी-20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर कब्जा केला.
advertisement
advertisement
सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडचा आणि फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून टीम इंडिया चॅम्पियन बनली. शेवटचे तिन्ही सामने टीम इंडियासाठी नॉक आऊट होते, एक पराभव आणि भारताचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं असतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा 5 वेळा पराभव होणार होता, पण 5 खेळाडूंनी मॅच विनिंग खेळी करून विजय खेचून आणला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये अक्षर पटेलने दोन वेळा उत्कृष्ट फिल्डिंग केली, ज्यामुळे सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरला आणि भारताचा 7 रननी थरारक विजय झाला. अक्षर पटेलने बुमराहच्या बॉलिंगवर हॅरी ब्रुकचा 25 मीटर धावत उलटा जाऊन कॅच पकडला. यानंतर त्याने बाऊंड्री लाईनवर विल जॅक्सचा कॅच पकडून तो शिवम दुबेच्या हातात दिला.







