1 जानेवारी... मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस, 213 लोकांचा झाला होता मृत्यू; असं काय घडलं होतं?

Last Updated:
1 January Mumbai Plane Crash : 1 जानेवारी सगळीकडे नवीन वर्षाचा उत्साह आहे. पण मुंबईत मात्र याच दिवशी अशी घटना घडली होती, जे काही जण अजूनही विसरलेले नाहीत.
1/5
1 जानेवारी, नवीन वर्षाचा पहिला दिवस, सगळ्यांनी नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. अगदी मुंबईतही पार्टी करून न्यू इअर सेलिब्रेशन होतं आहे. पण मुंबईच्या इतिहासात मात्र हा एक काळा दिवस आहे. बरोबर 48 वर्षांपूर्वी याच दिवशी एक अशी घटना घडली होती, जी कधीच विसरता येणार नाही. तब्बल 213 लोकांनी आपला जीव गमावला होता.
1 जानेवारी, नवीन वर्षाचा पहिला दिवस, सगळ्यांनी नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. अगदी मुंबईतही पार्टी करून न्यू इअर सेलिब्रेशन होतं आहे. पण मुंबईच्या इतिहासात मात्र हा एक काळा दिवस आहे. बरोबर 48 वर्षांपूर्वी याच दिवशी एक अशी घटना घडली होती, जी कधीच विसरता येणार नाही. तब्बल 213 लोकांनी आपला जीव गमावला होता.
advertisement
2/5
1 जानेवारी 1978 ची रात्र... मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून रात्री 8 वाजता एअर इंडियाच्या सम्राट अशोक या विमानाने उड्डाण केलं. एअर इंडियाने 1971 मध्ये खरेदी केलेलं हे पहिलं बोईंग 747. त्याचं नाव मौर्य सम्राट अशोक यांच्या नावावर ठेवण्यात आलं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते एअर इंडियाच्या महाराजा-थीम असलेल्या लक्झरी ताफ्यातील पहिलं विमान होतं.
1 जानेवारी 1978 ची रात्र... मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून रात्री 8 वाजता एअर इंडियाच्या सम्राट अशोक या विमानाने उड्डाण केलं. एअर इंडियाने 1971 मध्ये खरेदी केलेलं हे पहिलं बोईंग 747. त्याचं नाव मौर्य सम्राट अशोक यांच्या नावावर ठेवण्यात आलं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते एअर इंडियाच्या महाराजा-थीम असलेल्या लक्झरी ताफ्यातील पहिलं विमान होतं.
advertisement
3/5
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान 213 प्रवाशांसह दुबईच्या दिशेने निघालं होतं. विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच विमान शहराच्या किनाऱ्यापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात कोसळलं.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान 213 प्रवाशांसह दुबईच्या दिशेने निघालं होतं. विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच विमान शहराच्या किनाऱ्यापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात कोसळलं.
advertisement
4/5
घटनेनंतर हा कटाचा भाग असावा असा संशय सुरुवाताली निर्माण झाला होता. पण तपासात हा अपघात असल्याचं समोर आलं. समुद्रातून सापडलेल्या विमानाच्या अवशेषांच्या तपासणीत विमानात काही क्षणातच तांत्रिक बिघाड झाल्याचं समजलं. विमान नियंत्रित करणे, सुरक्षित ठिकाणी नेणंदेखील अशक्य झालं.
घटनेनंतर हा कटाचा भाग असावा असा संशय सुरुवाताली निर्माण झाला होता. पण तपासात हा अपघात असल्याचं समोर आलं. समुद्रातून सापडलेल्या विमानाच्या अवशेषांच्या तपासणीत विमानात काही क्षणातच तांत्रिक बिघाड झाल्याचं समजलं. विमान नियंत्रित करणे, सुरक्षित ठिकाणी नेणंदेखील अशक्य झालं.
advertisement
5/5
विमानात 190 प्रवासी आणि 23 कर्मचारी होते. अपघातानंतर अनेक दिवस शोध सुरू राहिला. पण कुणीच जिवंत सापडलं नाही. नौदलाने आशा सोडली नव्हती, कुणी वाचलं असेल, यासाठी नौदलाचं जहाज शोध घेतच होतं. पण अपघातातून कोणीही बचावलं नाही.
त 190 प्रवासी आणि 23 कर्मचारी होते. अपघातानंतर अनेक दिवस शोध सुरू राहिला. पण कुणीच जिवंत सापडलं नाही. नौदलाने आशा सोडली नव्हती, कुणी वाचलं असेल, यासाठी नौदलाचं जहाज शोध घेतच होतं. पण अपघातातून कोणीही बचावलं नाही.
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement