जगात 'या' देशातील मुलं गणितात सगळ्यात जास्त हुशार; भारताचा नंबर कितवा?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Maths Sharp Student : जगभरातील मुलांच्या गणित कौशल्यांचं मूल्यांकन करण्यासाठी एक विशेष चाचणी घेतली जाते. प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट म्हणजे PISA टेस्ट आयोजित केली जाते.
गणिताचं उगमस्थान असून जगाला शून्यापासून ते आधुनिक बीजगणितापर्यंत अनेक मूलभूत संकल्पना देणारा देश आहे, असं म्हणता येईल. कारण भारत आणि गणित यांचा संबंध खूप जुना आणि खोल आहे, जिथं प्राचीन भारतीयांनी शून्य, दशांश पद्धत, बीजगणित, त्रिकोणमिती आणि वैदिक गणित यांसारख्या संकल्पना जगाला दिल्या. ज्यांनी गणिताच्या विकासात क्रांती घडवली. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांसारख्या गणितज्ज्ञांनी यात मोठे योगदान दिलं, ज्यामुळे गणित आज जगभरात विज्ञानाचा आधार बनलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार लेटेस्ट रिझल्टमध्ये सिंगापूरच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त गुण मिळवले आहेत. सिंगापूरचा गणित गुण 575 गुणांच्या जवळपास होता, जो ओईसीडीच्या सरासरी 472 गुणांपेक्षा खूपच जास्त होता. सिंगापूरने जगातील सर्वोत्तम देशांपैकी एक म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं आहे. सिंगापूर पुन्हा एकदा गणितात सर्वोत्तम कामगिरी करणारा देश म्हणून उदयास आला आहे.
advertisement
सिंगापूरनंतर उच्च कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये चीनचे मकाऊ आणि तैपेई प्रदेश आहे. मकाऊ आणि चिनी तैपेई यांनी 500 च्या दशकाच्या मध्यात गुण मिळवले. तर यानंतर तर जपान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे. हे देश गणित, विज्ञान आणि वाचन चाचण्यांमध्ये सातत्याने उच्च गुण मिळवतात. एस्टोनिया आणि स्वित्झर्लंड सारखे युरोपीय देश देखील चांगले स्थान मिळवतात, जरी ते पूर्व आशियाई देशांपेक्षा खूप मागे होते.
advertisement
advertisement
भारताने पहिल्यांदा 2009 मध्ये मूल्यांकनात भाग घेतला होता. त्या वर्षी हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली होती. त्यावेळी भारत 74 सहभागी प्रदेशांपैकी किर्गिस्तानच्या आधी 73 व्या क्रमांकावर होता. पण त्यानंतर भारताने या चाचणीतील सातत्य कमी राहिलं आहे. आताच्या चाचणीतही भारताचा सहभाग नव्हता.









