दुचाकीवर आले, कोयता काढला अन् अवघ्या 2 मिनिटात एक कोटीचे दागिने लंपास; पुण्यात भरदिवसा दरोडा

Last Updated:

पानशेत रस्त्यावरील 'वैष्णवी ज्वेलर्स' या दुकानावर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवला. चोरट्यांनी अवघ्या दोन मिनिटांत सुमारे एक कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

पुण्यात भरदिवसा दरोडा
पुण्यात भरदिवसा दरोडा
पुणे: सिंहगड पायथ्याशी असलेल्या खानापूर (ता. हवेली) परिसरात शुक्रवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पानशेत रस्त्यावरील 'वैष्णवी ज्वेलर्स' या दुकानावर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवला. चोरट्यांनी अवघ्या दोन मिनिटांत सुमारे एक कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेने खडकवासला आणि सिंहगड भागात व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जेव्हा दुकानाचे मालक श्री. बाबर, त्यांचा आजारी मुलगा आणि दोन महिला कर्मचारी दुकानात उपस्थित होते. तेव्हा दोन दुचाकींवरून पाच जण तिथे पोहोचले. या सर्वांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. दुकानात शिरताच दरोडेखोरांनी धारदार कोयते उपसले आणि उपस्थित सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून आलेल्या या टोळीने काचेच्या कपाटातील सुमारे ७५ ते ८० तोळे सोन्याचे दागिने अवघ्या दीड ते दोन मिनिटांत पिशव्यांमध्ये भरले आणि पानशेतच्या दिशेने वेगाने पसार झाले.
advertisement
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये पाच चोर दुकानात शिरताना दिसतात. अतिशय वेगात त्यातील काहीजण दुकानातील सोन्याचे दागिने पिशवीत भरायला सुरूवात करतात. तर एकजण मालक आणि दुकानातील कामगारांना हातातील हत्यार दाखवून धमकावताना दिसतो.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मार्गाचा तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दरोडेखोरांनी या परिसराची गेल्या काही दिवसांपासून बारकाईने पाहणी केली असावी, कारण त्यांना दुकानातील गर्दीची वेळ आणि पळून जाण्याचा रस्ता नेमका माहिती होता. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दुचाकीवर आले, कोयता काढला अन् अवघ्या 2 मिनिटात एक कोटीचे दागिने लंपास; पुण्यात भरदिवसा दरोडा
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement