advertisement

अखेर चंद्रग्रहण संपलं! ग्रहण संपताच काय करावं अन् काय टाळावं? आत्ताच वाचा

Last Updated:

आज, 3 मार्च 2026 रोजीचे खग्रास चंद्रग्रहण आता आपल्या अंतिम टप्प्यात आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी ग्रहणाचा 'मोक्ष काळ' झाला आहे.

News18
News18
Chandra Grahan : आज, 3 मार्च 2026 रोजीचे खग्रास चंद्रग्रहण आता आपल्या अंतिम टप्प्यात आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी ग्रहणाचा 'मोक्ष काळ' होत असून, आता हाताशी अवघी काही मिनिटे उरली आहेत. ज्योतिष आणि धर्मशास्त्रात ग्रहणाच्या मोक्ष काळाला अत्यंत महत्त्व आहे, कारण यानंतरच खऱ्या अर्थाने 'शुद्धीकरण' प्रक्रिया सुरू होते. ग्रहण संपताच नेमकी कोणती कामे प्राधान्याने करावीत आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबद्दलचे महत्वाचे नियम जाणून घ्या.
ग्रहण संपताच करायची 6 महत्त्वाची कामे
पवित्र स्नान आणि वस्त्र बदलणे
ग्रहण सुटल्याच्या क्षणी सर्वात आधी स्नान करणे अनिवार्य आहे. शास्त्रांनुसार, ग्रहणादरम्यान वातावरण अशुद्ध झालेले असते. आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ किंवा गंगाजल टाकल्यास शरीराची नकारात्मक ऊर्जा निघून जाते. स्नानानंतर धुतलेली आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
देवघर आणि मूर्तींचे शुद्धीकरण
स्वतःच्या स्नानानंतर देवघराचे दरवाजे उघडावेत. घरातील देवमूर्तींना गंगाजलाने अभिषेक करावा किंवा स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घ्यावे. ग्रहण काळात देवांना स्पर्श करणे वर्ज्य असते, त्यामुळे मोक्ष काळानंतर त्यांचे शुद्धीकरण करूनच पूजा सुरू करावी.
advertisement
घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडा
ग्रहण संपताच संपूर्ण घराची स्वच्छता करावी. घराच्या कानाकोपऱ्यात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे. यामुळे ग्रहणामुळे निर्माण झालेली नकारात्मकता नष्ट होते आणि घरामध्ये सात्त्विक ऊर्जेचा संचार होतो.
दानधर्माचा विधी
चंद्रग्रहण संपल्यानंतर केलेले दान 'अक्षय' फळ देते असे मानले जाते. ग्रहण संपताच गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तूंचे दान करा. यामध्ये तांदूळ, साखर, पांढरे वस्त्र किंवा दही यांचा समावेश असावा. यामुळे चंद्राचा शुभ प्रभाव तुमच्यावर पडतो.
advertisement
शिळे अन्न टाकून द्या
ग्रहणापूर्वी ज्या अन्नामध्ये तुम्ही तुळशीची पाने टाकली नव्हती, असे शिजवलेले अन्न किंवा कापलेली फळे मोक्ष काळानंतर खाऊ नयेत. ते अशुद्ध मानले जाते. ग्रहण संपल्यावर ताजा स्वयंपाक करावा किंवा शुद्ध केलेले पदार्थच ग्रहण करावेत.
कापूर जाळून आरती करा
घराचे शुद्धीकरण झाल्यावर देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळावा. कापराचा धूर घरातील जंतू आणि नकारात्मक लहरी दूर करतो. त्यानंतर कुलदेवतेची आरती करून ग्रहणाच्या दोषातून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थना करावी.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
अखेर चंद्रग्रहण संपलं! ग्रहण संपताच काय करावं अन् काय टाळावं? आत्ताच वाचा
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement