लेकीच्या लग्नात आईने का पाहू नये मंगलाष्टका? न पाहण्यामागे दडलंय 'हे' खास गुपित, तुम्हाला माहिती आहे का?

Last Updated:

मराठी संस्कृती आणि लग्न सोहळ्यांमध्ये अनेक प्रथा परंपरेने चालत आलेल्या आहेत. यांपैकी एक महत्त्वाची आणि तितकीच हळवी प्रथा म्हणजे 'आईने मुलीची मंगलाष्टका पाहू नये'.

News18
News18
Wedding Rituals : मराठी संस्कृती आणि लग्न सोहळ्यांमध्ये अनेक प्रथा परंपरेने चालत आलेल्या आहेत. यांपैकी एक महत्त्वाची आणि तितकीच हळवी प्रथा म्हणजे 'आईने मुलीची मंगलाष्टका पाहू नये'. आधुनिक काळात या प्रथांकडे केवळ 'अंधश्रद्धा' म्हणून पाहिले जात असले, तरी त्यामागे काही मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे सांगितली जातात. रीतीप्रमाणे आईने मुलीची मंगलाष्टका का पाहू नये आणि त्यामागची भूमिका काय? याच नेमकं कारण जाणून घेऊयात.
आईने मुलीची मंगलाष्टका का पाहू नये?
हळवेपणा आणि भावनिक उद्वेग: आई आणि मुलगी यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असते. लग्नाच्या वेळी जेव्हा मंगलाष्टका म्हटल्या जातात, तेव्हा त्यातील शब्दांतून मुलीचे बालपण, तिचे मोठे होणे आणि आता तिचे माहेर सोडून सासरी जाणे याचे वर्णन असते. आईचे मन अत्यंत हळवे असते. मंगलाष्टकांच्या सुरांनी आईचा संयम सुटून ती ढसाढसा रडू लागते.
advertisement
अशुभ मानण्याचे कारण: हिंदू संस्कृतीत लग्नाला 'शुभ कार्य' मानले जाते. मंगलाष्टकांच्या वेळी वधू आणि वराने एकमेकांकडे आनंदाने पाहायचे असते. जर समोरच आई रडताना दिसली, तर मुलीचे मन विचलित होते आणि तिचेही डोळे भरून येतात. शुभ कार्याची सुरुवात अश्रूंनी होऊ नये, तसेच वधूचे मन डळमळीत होऊ नये, या भावनेतून आईला त्या वेळी बाजूला राहण्यास सांगितले जाते.
advertisement
नेमकं कारण असंही...
पूर्वीच्या काळी मुलाकडची मंडळी, हुंडा, मानपान आणि शुल्लक कारणांवरून लग्न मोडत असे. अशावेळेस आई मंगलाष्टका सुरु असताना कुलदेवीची पूजा करत असे. मुलीच्या लग्नात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून हे केले जात असे.
आईने लेकीचं लग्न पाहिलं तर काय होतं?
'आईने लेकीचं लग्न पाहिलं तर काहीतरी अघटीत घडेल', अशी भीती काही जुन्या लोकांमध्ये असते. मात्र, याचा कोणताही ठोस शास्त्रीय आधार नाही. पूर्वीच्या काळी 'कन्यादान' हे वडिलांचे कर्तव्य मानले जाई आणि आई घराच्या कामात किंवा पाहुण्यांच्या आदरातिथ्यात व्यग्र असे.
advertisement
खरे कारण: आईने लग्न पाहिले तर 'मुलीला माहेरची ओढ लागून राहील' आणि ती नवीन संसारात लवकर रुळणार नाही, अशी एक धारणा होती. आईचा मोह सुटावा आणि मुलीने नव्या आयुष्याची सुरुवात खंबीरपणे करावी, हाच यामागील मूळ उद्देश होता.
मंगलाष्टकेच्या वेळी कुलदेवीची पूजा का केली जाते?
मंगलाष्टका सुरू होण्यापूर्वी किंवा त्या दरम्यान कुलदेवीची आराधना करण्यामागे काही अध्यात्मिक कारणे आहेत.
advertisement
कुळाचे रक्षण: कुलदेवी ही कुटुंबाची रक्षक मानली जाते. मुलीने आपले 'मूळ कुळ' सोडून 'दुसऱ्या कुळात' प्रवेश करण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेणे आवश्यक असते. यामुळे तिला नवीन घरात सुख-समृद्धी लाभते.
नकारात्मक ऊर्जा दूर करणे: मंगलकार्यात कोणतीही विघ्न येऊ नयेत आणि कोणाचीही 'नजर' लागू नये, यासाठी कुलदेवीला साकडे घातले जाते.
विवाह संस्काराची पूर्णता: हिंदू धर्मात कोणताही संस्कार कुलदेवतेच्या स्मरणाशिवाय पूर्ण मानला जात नाही. मंगलाष्टका हा विवाहातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो, म्हणून या वेळी कुलदेवीची उपस्थिती प्रार्थनेद्वारे मानली जाते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
लेकीच्या लग्नात आईने का पाहू नये मंगलाष्टका? न पाहण्यामागे दडलंय 'हे' खास गुपित, तुम्हाला माहिती आहे का?
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement