अफाट जिद्द! पतीचं निधन होताच सासरच्यांनी दाखवले रंग, मध्यरात्री काढलं घराबाहेर, 2 मुलांना घेतलं, पुढे... 

Last Updated:

राजंती देवी यांचा जीवनप्रवास संघर्षमय असूनही प्रेरणादायी आहे. पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी मध्यरात्री घराबाहेर काढले. तीन दिवस मुलांसह दुकानांच्या आडोशाला राहून उपाशीपोटी दिवस काढले. मात्र...

Rajanti Devi
Rajanti Devi
"अर्ध्या लोकसंख्येचं सत्य हे आहे की स्त्रिया कोमल असतात, पण कमजोर नाही", हे वाक्य गीजगडच्या रहिवासी राजंती देवी यांनी खरं करून दाखवलं आहे. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही हार मानली नाही आणि आपल्या धैर्याने एक आदर्श निर्माण केला. सुमारे 30 वर्षांपूर्वी सिकंदराचे रहिवासी जयराम सैनी यांच्याशी विवाह झाल्यानंतर राजंती देवींचं आयुष्य सामान्यपणे सुरू होतं. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर त्यांच्या पतीचं अचानक निधन झालं.
भात खाऊन त्यांनी आपल्या मुलांना ठेवलं जिवंत 
या दुःखद घटनेनंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना दोन लहान मुलांसोबत रात्री 12 वाजता घरातून हाकलून दिलं. निराशेच्या आणि वेदनेच्या त्या काळात राजंती देवींनी सिकंदरा क्रॉसिंगवर दुकानांच्या छताखाली तीन दिवस आपल्या मुलांसोबत कसेतरी काढले. फक्त भात खाऊन त्यांनी आपल्या मुलांना जिवंत ठेवलं. जेव्हा सासरच्या लोकांकडून कोणताही आधार मिळाला नाही, तेव्हा त्या मुलांना घेऊन त्यांच्या मावशीकडे गेल्या आणि काही दिवसांनी आपल्या माहेरी, कुंडेरा डोंगरला परतल्या.
advertisement
आज त्या स्वतःच्या पायावर आहेत उभ्या
पतीच्या निधनानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे संघर्षाने भरलेलं होतं. आर्थिक अडचणींमुळे त्यांना प्रत्येक घासासाठी संघर्ष करावा लागत होता. पण हार मानण्याऐवजी राजंती देवींनी स्वतःला सावरलं आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्याची शपथ घेतली. त्यांनी सिकंदरा चौकात दगड फोडण्याच्या ठिकाणी मोलमजुरीचं काम सुरू केलं, जिथे त्यांना दिवसाचे फक्त 50 रुपये मिळायचे. 12 वर्षे कठोर परिश्रम करून त्यांनी आपले दोन मुलगे संतोष आणि मुकेश यांचा सांभाळ केला, त्यांना शिकवलं आणि त्यांची लग्नं केली. आज राजंती स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
advertisement
यानंतर राजंती देवींनी जमीन भाड्याने घेतली आणि दगड कोरीव काम करण्याचे मशीन बसवून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळीही त्यांच्या सासरच्या लोकांनी अनेक अडथळे आणले, पण राजंतींनी हिंमत हारली नाही आणि सर्व अडचणींचा धैर्याने सामना केला. आज राजंती देवी गीजगडमध्ये स्वतःच्या भूखंडावर घर बांधून आनंदी जीवन जगत आहेत. त्या केवळ मशीन चालवून आपला व्यवसाय वाढवत नाहीत, तर राजस्थानसोबतच इतर राज्यांमध्येही दगडाचा व्यवसाय करत आहेत.
advertisement
शिक्षित मुले व्यवसाय पुढे नेत आहेत
निरक्षर असूनही त्यांनी व्यवसायाचा हिशोब स्वतः सांभाळला आणि आता त्यांचे शिक्षित मुलगे हा व्यवसाय पुढे नेत आहेत. राजंती देवी म्हणतात, “मी माझ्या आयुष्यात खूप दुःख भोगले, पण मी कधीही हार मानली नाही. मला सर्व महिलांना सांगायचे आहे की त्यांनी स्वतःला कधीही कमजोर समजू नये. जीवनात कोणतीही समस्या आली तरी धैर्याने तिचा सामना करा. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतात.”
advertisement
मराठी बातम्या/Success Story/
अफाट जिद्द! पतीचं निधन होताच सासरच्यांनी दाखवले रंग, मध्यरात्री काढलं घराबाहेर, 2 मुलांना घेतलं, पुढे... 
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement