advertisement

Jio, Airtel सह Vi यूझर्सला मोठा दिलासा! 20 रुपयांत 4 महिने अ‍ॅक्टिव्ह राहील सिम

Last Updated:

TRAI New SIM Rule: देशात स्मार्टफोनची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक एकापेक्षा जास्त सिमकार्ड ठेवतात. पण जुलै 2024 नंतर दोन्ही सिम रिचार्ज करणे महाग झाले आहे.

जिओ, एअरटेल की व्हीआय
जिओ, एअरटेल की व्हीआय
TRAI New SIM Rule: देशात स्मार्टफोनची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक एकापेक्षा जास्त सिमकार्ड ठेवतात. पण जुलै 2024 नंतर दोन्ही सिम रिचार्ज करणे महाग झाले आहे. हे लक्षात घेऊन आता TRAI ने एक नवीन नियम आणला आहे ज्यामुळे Jio, Airtel आणि Vi यूझर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
महागड्या रिचार्जपासून सुटका
पूर्वी सेकेंडरी सिम वापरण्यासाठी रिचार्ज करावे लागायचे. तसेच नंबर बंद होण्याच्या भीतीने लोक दुसऱ्या सिममध्ये रिचार्ज करायचे. पण आता TRAI (Telecom Regulatory Authority of India) रिलायन्स जिओ, Airtel, Vi आणि BSNL च्या यूझर्सना नवीन नियमांनुसार दिलासा मिळणार आहे.
advertisement
काय आहे ट्रायचा नवा नियम?
ट्रायच्या कन्झ्युमर हँडबुकनुसार, रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर तुमचे सिम 90 दिवसांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहते. म्हणजे रिचार्ज संपल्यानंतरही तुमचा नंबर तीन महिने ॲक्टिव्ह राहील.
20 रुपयांची 120 दिवसांची व्हॅलिडिटी
ट्रायच्या म्हणण्यानुसार, तुमच्या नंबरवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज नसेल आणि त्यात 20 रुपये प्रीपेड शिल्लक असतील, तर कंपनी ते 20 रुपये कापून 30 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देईल. अशा प्रकारे तुमचा नंबर एकूण 120 दिवस अ‍ॅक्टिव्ह राहू शकतो.
advertisement
एवढेच नाही तर 120 दिवस पूर्ण झाल्यानंतरही ट्राय तुम्हाला तुमचे सिम रिॲक्टिव्हेट करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ देते. या 15 दिवसांतही सिम अ‍ॅक्टिव्ह न केल्यास, तो नंबर कायमचा लॉक केला जाईल आणि तो दुसऱ्या व्यक्तीला दिला जाईल. या नियमामुळे, दुय्यम सिम यूझर्सना महागड्या रिचार्जपासून दिलासा मिळणार आहे आणि गरजेनुसार नंबर अ‍ॅक्टिव्ह ठेवणे सोपे होईल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio, Airtel सह Vi यूझर्सला मोठा दिलासा! 20 रुपयांत 4 महिने अ‍ॅक्टिव्ह राहील सिम
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement