Ration Card: शेवटची संधी! KYC केलं नाही तर रेशन कार्डमधून नाव रद्द होणार, ही शेवटची तारीख
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई: रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. जर केलं नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. शिवाय कार्डही अॅक्टिवेट राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही केवायसी केलं नसेल तर आताच रेशन दुकानावर जाऊन तुमचं केवायसी करून घ्या.
ई-केवायसी का आवश्यक आहे?
ई-केवायसीमुळे रेशन कार्डधारकांची माहिती सरकारला मिळते. तसेच, रेशन कार्ड योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार टाळता येतो. रेशन कार्डवर कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी कशी करावी?
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही खालील पद्धतीने ई-केवायसी करू शकता:
ऑनलाईन: घरी बसून तुम्ही ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकता.
advertisement
जवळच्या प्रज्ञा केंद्रात जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता.
रेशन दुकानदार: तुमच्या रेशन दुकानदाराच्या मदतीने तुम्ही ई-केवायसी करू शकता.
ई-केवायसीसाठी काय आवश्यक आहे?
रेशन कार्ड
कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
ई-केवायसीचे फायदे
फसवणूक रोखली जाते: रेशन कार्डचा वापर फक्त योग्य व्यक्तीच करतात, हे सुनिश्चित होतं.
माहितीची अचूकता: रेशन कार्डधारकांची माहिती अपडेटेड आणि अचूक राहते.
advertisement
सोपी प्रक्रिया: ऑनलाईन प्रक्रिया सोपी आणि जलद आहे.
पारदर्शकता: ई-केवायसीमुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहते.
28 फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी करा!
रांची जिल्ह्यातील सर्व रेशन कार्डधारकांना 28 फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होऊ शकतं, त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 13, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/Utility/
Ration Card: शेवटची संधी! KYC केलं नाही तर रेशन कार्डमधून नाव रद्द होणार, ही शेवटची तारीख