बीड : शेतीत कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र फवारणीची योग्य वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, पिकांच्या वाढीच्या ठराविक अवस्थेत आणि अनुकूल हवामानात फवारणी करणे आवश्यक असते. वेळेवर उपाय न केल्यास किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आणि त्याचा थेट फटका उत्पादनावर बसतो. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे



