बीड : गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार जाणवू लागले आहेत. एकीकडे दिवसा उन्हाची तीव्रता वाढत असताना संध्याकाळनंतर गारवा जाणवतो. या बदलत्या हवामानामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि अॅलर्जी यांसारख्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील अचानक होणारे बदल आणि शरीरातील इम्युनिटी यातील असंतुलन यामुळे हे आजार वेगाने पसरत आहेत.



