कोल्हापूर : आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या वाढू लागल्या आहेत. त्यातही मानसिक आरोग्य पूर्णपणे ढासळत चालंलं आहे. अपयश, बदलती जीवनशैली, प्रेमप्रकरण, कामाचं प्रेशर, करिअरची चिंता, व्यवसायाची चिंता अशा एक ना अनेक कारणांमुळे लोक नैराश्याचे शिकार होत आहेत. विशेष म्हणजे यात तरुणपिढीचा समावेश आहे. सततच्या कामाच्या व्यापामुळे तरुणांना प्रचंड थकवा जाणवतो. यामुळे त्यांना सतत चिडचिड आणि तणावाचा सामना करावा लागतो. अनेकदा आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे आपण नैराश्याच्या खोल दरीत लोटले जाते. परंतु, अशी काही लक्षणं आहेत. जे आपण कुठेतरी नैराश्याचे शिकार झालो आहोत याची जाणीव करुन देतात. याबाबत कोल्हापूरचे प्रसिद्ध संमोहन उपचार आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उत्तम गव्हाणे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
Last Updated: Jan 19, 2026, 15:43 IST


